आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन तालुक्यातील शेलूद ते धावडा या नऊ किलोमीटर रस्त्याचे डाबंरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे जात असून यामुळे परिसरातील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न मिटला आहे. हा रस्ता खांदेश,विदर्भाला अजिंठा ते बुलढाणा महामार्ग धावडा ते गोद्री खांदेशाला जोडला जाणारा असल्याने वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र या रस्त्याची दुरावस्था झाल्याने वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. शेलूद ते धावडा हा रस्ता विदर्भ व खान्देशाला जोडल्या जाणारा राज्यमार्ग आहे. अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत पडून होते परंतु खांदेशात कुंभमेळा झाल्याने तत्काळ या रस्त्याचे काम करण्यात आले.
शेलूद व धावडा हे तालुक्यातील मोठी लोकसंख्या असलेली गावे आहे. शिवाय तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून वालसावंगीकडे पाहिल्या जाते. या गावाशी परिसरातील अनेक गावाचा संपर्क येत असतो. त्यामुळे नागरिकांची मोठी ये-जा या रस्त्यावर असते. खराब रस्त्यामुळे नऊ किलोमीटर रस्त्याचे अंतर कापण्यासाठी पंचवीस मिनीटाचा कालावधी लागत असत. दरम्यान या रस्त्यावरून बारहेगावी खासगी वाहन करुन जायचे झाल्यास वाहनचालक देखील रस्ता खराब असल्याचे कारण देत जास्तीचे भाडे आकारत असल्याने याचा नाहक भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना बसत होता. या रस्त्यावरून जाळीचा देव, कालीका देवी, पद्मावतीचे वाल्मिकी महाराज आदी धार्मिक ठिकाणी जावे लागत आसल्याने यात्रेच्या काळात बाहेरुन येणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.