आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ‎:आरटीई : सहा हजार अर्ज,‎ 25 मार्चपर्यंत मुदतवाढ‎

जालना6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎आरटीई कोट्यातून प्रवेश देण्याच्या‎ नोंदणीला १ मार्च रोजी ३ वाजता‎ सुरू करण्यात आली. याला १७‎ मार्च रोजीची डेडलाईन देण्यात‎ आली होती. या वेळेपर्यंत तब्बल ६‎ हजार ३८ म्हणजेच क्षमतेच्या‎ तिपटीने अर्ज आले. २५ मार्च पर्यंत‎ मुदतवाढ देण्यात आली आहे.‎ वर्ष २०२३-२४ या वर्षी करिता‎ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये‎ अंतर्गत आरटीई प्रवेश पात्र शाळांचे‎ व्हेरिफिकेशन २३ जानेवारी २०२३‎ पासून सुरु केले. तर याला १०‎ फेब्रुवारी रोजी ब्रेक देण्यात आला.‎ बालकांचा मोफत व सक्तीच्या‎ शिक्षणाचा अधिकार अधिनियम‎ २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के‎ प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने‎ राबवण्यात येतेे.

त्यानुसार वर्ष‎ २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी‎ आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची‎ ऑनलाईन सोडत काढून जालना‎ जिल्ह्यात २९१ शाळांमध्ये २ हजार‎ ७९५ विद्यार्थ्यांना संधी देण्यात‎ आली.‎ दरम्यान, प्रक्रीया राबवल्याने ४०‎ टक्के विद्यार्थ्यांच्या जागा रिक्तच‎ राहिल्या. हा गंभीर प्रकार लक्षात‎ घेता यावर्षी यंत्रणेने थेट कार्यवाही‎ करण्याचा धाक दाखवल्याने‎ पहिल्याच टप्यात क्रांती घडून‎ आली आहे.‎ यावर्षी प्रक्रीया राबवुन १०० टक्के‎ प्रवेश करण्यासाठी लवकर‎ सुरूवात करण्यात आली आहे. वर्ष‎ २०२३ - २४ साठी प्रक्रीया सुरू‎ केली असून २८४ शाळांची १००‎ टक्के करण्याला यश मिळाले.‎

बातम्या आणखी आहेत...