आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्मानी संकट:साहेब, हातातोंडाशी आलेला घास वाया‎ गेला; काहीही करा, पण आम्हाला मदत द्या‎

पिंपळगाव रेणुकाई‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव‎ रेणुकाई परिसरात शुक्रवारी दुपारी व‎ सायंकाळी झालेल्या विजांच्या‎ कडकडाट व अवकाळी पावसामुळे‎ काही भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले‎ आहे. दरम्यान या भागात वाऱ्याचा वेग‎ अधिक असल्याने सोंगणीसाठी आलेले‎ मकाचे पिक तसेच सुर्यफुल जमिनीवर‎ आडवे झोपले असल्याची माहिती‎ शेतकऱ्यांनी दिली. दरम्यान हवामान‎ खात्याने आणखी काही दिवस‎ अवकाळीचा जोर कायम राहणार‎ असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे‎ शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग उभे‎ राहीले आहे. सलग दोन वर्षापासून‎ रब्बीत नुकसान सहन करीत असलेल्या‎ शेतकऱ्यांना यंदा देखील मागील दिवस‎ समोर येते की काय?अशी धास्ती उभी‎ राहीली आहे. नुकसान झालेल्या‎ शेतकऱ्यांनी साहेब कायबी करा पण‎ आता थेट मदत करा अशी आर्त हाक‎ शासन दरबारी घातली आहे.‎ तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील‎ सहा ते सात वर्षांपासून निसर्गाच्या‎ लहरीपणाचा फटका बसत आहे.

कधी‎ ओला तर कधी कोरड्या दुष्काळाने‎ शेतकरी पुरते हैराण झाले आहे. यावर्षी‎ अतिवृष्टीमुळे खरीपाचे मोठ्या‎ प्रमाणावर नुकसान झाले. मात्र मुबलक‎ पाण्यावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी‎ मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा, मका,‎ ज्वारी, सुर्यफुल आदी पिकांची ६७‎ हजार ४०० हेक्टरवर रब्बी पिकांची‎ लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी योग्य‎ नियोजन करुन रब्बीतील पिके अफाट‎ कष्ट घेऊन बहरवली. परंतु रब्बी हंगाम‎ आता आटोक्यात येत असताना उशिरा‎ पेरणी केलेल्या पिंपळगाव रेणुकाई‎ परिसरातील शेतकऱ्यांना शुक्रवारी‎ अवकाळी पावसाचा तडाखा बसला‎ आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ‎ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची‎ चिंता वाढली आहे. पाऊस पडेल या‎ धास्तीने अनेक शेतकऱ्यांनी जमेल त्या‎ पद्धतीने गहू, हरभऱ्याच्या सोंगणीला‎ सुरुवात करुन पिके मळणी करुन घरी‎ आणली आहे. परंतु अद्यापही अनेकांचे‎ पीक शेतात उभे आहेत. शुक्रवारी‎ पिंपळगाव रेणुकाई परिसरात काही‎ भागात विजांच्या कडकडाटासह‎ अधूनमधून अवकाळी पाऊस झाला.‎ तर काही भागात वादळी वाऱ्यामुळे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मका तसेच सुर्यफुलाचे नुकसान झाले‎ आहे.

अशातच काही शेतकऱ्यांनी‎ शेतात हरभरा, गहु पिकाची सोंगणी‎ करुन ठेवली आहे. ती पिके पावसात‎ भिजली असल्याने त्यांना फटका‎ बसण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त‎ केली आहे. खरीपात नुकसान झाले.‎ उसनवारी करून रब्बीची पेरणी केली‎ आणि त्यात देखील आता हे अस्मानी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संकट उभे राहीले असल्याने शेतकरी‎ हतबल झाले आहे. दरवर्षी निसर्गाचा‎ लहरीपणा शेतकऱ्यांना रस्त्यावर‎ आणण्यास कारणीभूत ठरत असल्याने‎ शेती करावी की नाही असा प्रश्न‎ शेतकऱ्यांना पडला आहे. शुक्रवारी‎ शेतकऱ्यांनी सोंगणी करुन ठेवलेल्या‎ पिंकाना ताडपतरीद्वारे झाकण्याची‎ लगबग सुरू केली होती.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎

आंबे, द्राक्षांना फटका‎
बेमोसमी पावसामुळे तालुक्यातील‎ आंबे व द्राक्ष बागांना फटका बसण्याची‎ भीती व्यक्त करण्यात येत आहे.‎ मुबलक पाण्यामुळे आंबे व द्राक्ष बागा‎ चांगल्या बहरात असतांना बदलत्या‎ वातावरणामुळे नुकसानीची शक्यता‎ असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.‎

दीड एकर मका पिकाचे‎ झाले नुकसान‎
खरीपात नुकसान झाले म्हणून रब्बीत‎ मोठी मेहनत घेऊन नुकसान भरुन‎ काढण्यासाठी पिकांना मोठा खर्च करुन‎ पिके हातात आणली. आता घास‎ हातातोंडाशी आलेला आहे. यातच‎ शुक्रवारी झालेल्या अवकाळी पाऊस व‎ वादळी वाऱ्यात दीड एकर मकाचे पिक‎ जमिनीवर आडवे झोपले आहे.‎ दरवर्षीच अशी परिस्थिती उद्भवत‎ असल्याने शेतकरी रस्त्यावर आले‎ आहे. सध्या हजारो हेक्टरवर पिके‎ शेतात उभी आहेत. शासनाने नुकसान‎ भरपाई द्यावी.‎ - गणेशराव देशमुख, शेतकरी, पिंपळगाव रे‎

बातम्या आणखी आहेत...