आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृतज्ञता भेट:श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी लवकरच‎ श्रीक्षेत्र जांबसमर्थला येणार : फडणवीस‎

जालना9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र‎ जांबसमर्थ येथील राष्ट्रगुरु श्री समर्थ‎ रामदास स्वामींच्या देवघरातील‎ श्रीरामप्रभू, सीतामाता, लक्ष्मणजी,‎ हनुमंत व इतर देवी देवतांच्या मुर्ती‎ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या.‎ राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री या‎ नात्याने या मूर्ती तपासाकामी वेळोवेळी‎ पाठपुरावा घेत मुर्तीचे शोध कार्य‎ पोलिस दलाच्या माध्यमातून पूर्ण‎ केल्याबद्दल समर्थ वंशज भूषण स्वामी‎ यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र‎ फडणवीस यांची मुंबई येथे कृतज्ञता‎ भेट घेतली. यावेळी आपण लवकरच‎ जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिरात‎ येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी‎ सांगितले.‎ समर्थ वंशज तथा श्रीराम मंदिर जांब‎ समर्थचे प्रमुख भूषण स्वामी यांनी‎ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा‎ कृतज्ञता पत्र देऊन सन्मान केला.‎ यावेळी सज्जनगड येथील श्री रामदास‎ स्वामी संस्थानचे विश्‍वस्त अ‍ॅड.महेश‎ कुलकर्णी, कण्हेरी मठाचे मठ‎ प्रतिनिधी राजप्रसाद इनामदार,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संस्थानचे कार्यप्रमुख रोहित‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जोगळेकर, नरेंद्र पुराणिक यांची‎ उपस्थिती होती.‎

या वेळी भूषण स्वामी यांनी सांगितले‎ की, राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास‎ स्वामींच्या देवघरातील शेकडो वर्षांची‎ परंपरा आणि इतिहास असणाऱ्या‎ श्रीराम मंदिरामधील रामोपासना आणि‎ सुर्योपासना गेल्या ३३ पिढ्यांपासून‎ अविरतपणे याठिकाणी सुरु असून‎ आपल्या विशेष प्रयत्नाने चोरीचा तपास‎ जलद गतीने पूर्ण झाला व रामदासी‎ सांप्रदायाचा अमूल्य ठेवा जांबेमध्ये‎ पुन्हा संस्थापित झाला.या आपल्या‎ कार्याप्रती आम्ही सर्व समर्थभक्त,‎ श्रीरामभक्त आणि रामदासी‎ सांप्रदायीक परिवार अत्यंत‎ कृतज्ञतापूर्वक ऋणी असल्याचे‎ उपमुख्यमंत्र्यांना सांगितले.‎

मूर्तीचा अजूनही शोध नाही‎
श्री समर्थ रामदास स्वामी भिक्षेच्यावेळी‎ आपल्या झोळीमध्ये ठेवत असलेली‎ मारूतीरायांची मूर्तीचा शोध अद्याप‎ लागलेला नाही असे भूषण स्वामी यांनी‎ उपमुख्यमंत्र्यांना सांगितले. लवकर त्या‎ मूर्तीचा शोध घेऊन ती मूर्ती मंदिरात‎ आणण्याचे आश्‍वासन उपमुख्यमंत्री‎ देवेंद्र फडणवीस यांनी दिले.‎

२२ मार्चपासून श्रीराम मंदिरात उत्सव‎
श्रीसमर्थ रामदास स्वामींचा ज्या मूर्तींना परीसस्पर्श झालेला आहे व प्रत्यक्ष प्रभू‎ श्रीरामांनी ज्या मूर्ती समर्थांच्या वडिलांना श्री सुर्याजीपंतांना प्रसादरुपाने दिल्या आहेत,‎ अशा श्रीराम मंदिरामध्ये यावर्षीचा रामनवमी उत्सव पाडवा २२ ते ३१ मार्चपर्यंत संपन्न‎ होणार आहे. यावर्षी श्रीराम नवमी ३० मार्च रोजी येत आहे. या दहा दिवसांमध्ये‎ श्रीरामरायासमोर अनेक मान्यवरांचे कीर्तन, प्रवचन, रामकथा, उपासना, गायन आदी‎ कार्यक्रम संपन्न होणार आहेत. अवघ्या महाराष्ट्रातून हजारो भाविक या दहा दिवसांच्या‎ उत्सवात श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जांबेत दाखल होत असतात. या‎ उत्सव कालावधीमध्ये आपण श्रीरामरायांच्या दर्शनासाठी आवश्य यावे अशी विनंती‎ भूषण स्वामी यांनी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...