आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याच्या समाजकल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह योजनेबाबत अनेक तक्रारी होतात. मात्र, त्याचे निरसन होत नाही. कारण या समस्या नेमक्या किती गंभीर स्वरूपाच्या आहेत, याची जाणिव वरिष्ठ अधिकाऱ्यांना नसते. यातून मार्ग काढण्यासाठी राज्याचे समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी वसतीगृह मुक्काम संवाद अशी अभिनव मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेंतर्गत त्यांनी जालन्यात संवाद साधला. त्याचे जोरदार स्वागत झाले. अनेक प्रकारच्या तक्रारी त्यांच्यापुढे सादर झाल्या. त्याची त्यांंनी आस्थेवाईकपणे नोंद घेतली. लवकरच समस्यांतून मार्ग काढला जाईल, असेही आश्वासन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.