आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:आष्टी परिसरात वादळी वारा, विजांच्या कडकडाटात‎ जोरदार पाऊस; रब्बी पिकांना बसला मोठा फटका‎

आष्टी‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरिपातील साठवून ठेवलेल्या‎ सोयाबीन, कापुस, तुर यांच्या‎ निचांकी भावामुळे उत्पादन शेतकरी‎ हैराण झालेला असतानाच सोमवारी‎ रात्री व मंगळवारी पहाटे विजेच्या‎ कडकडाट वादळीव ऱ्यासह‎ पावसाने हजेरी लावली. यात रब्बी‎ हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात‎ नुकसान झालेले आहे.‎ ऐन पिक कापणीच्या हंगामात‎ पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या‎ हातातोंडाशी आलेला घास हिरावला‎ गेला. या पावसात गहू, ज्वारी,‎ बाजरी, हरभरा यासह पिकांना मोठा‎ फटका बसला आहे.

त्यामुळे‎ नुकसानीचे पंचनामे करून सरसगट‎ नुकसान भरपाई देण्याची मागणी‎ केली जात आहे. मागील सलग तीन‎ वर्षांपासून संकटांची मालिका कायम‎ आहे. खरिपात अतिवृष्टीमुळे‎ सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मुग,‎ हरभरा या पिकांचे नुकसान झाल्याने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पिकांना मोठा फटका बसला होता.‎ यात पिकांचा उतारा हा निम्म्यावर‎ आला होता. त्यात पुढे मालाची‎ भाववाढ होईल म्हणून शेतकऱ्यांनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ माल घरात साठवला होता.

मात्र‎ भाववाढ न होता त्याच भावांचे दर‎ कोसळत असल्याने हैराण झालेल्या‎ शेतकऱ्यांना मध्येच पावसाने रब्बी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ हंगामातील काढणीला आलेल्या‎ पिकांचे नुकसान करुन मेटाकुटीला‎ आणले आहे. आष्टी मंडळातील‎ ३४९६ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून‎ त्यापैकी ३२६२ हेक्टर लागवडीसाठी‎ योग्य आहे त्यात यंदा गहूं ५२७;‎ ज्वारी ५२३,; हरभरा ६६२ हेक्टरवर‎ पेरणी झालेली होती.

दरम्यान,‎ गतवर्षीच्या तुलनेत खरिप पिकांना‎ कमी भाव मिळत असल्याने ते माल‎ घरातच साठवला आहे. उसनवारी‎ करत रब्बीची पेरणी केली आता‎ माल हातातोंडाशी आलेला असताना‎ तो पावसाने हिरावला सरकारने‎ पंचेनामे न करता सरसगट नुकसान‎ भरपाई द्यावी, अशी मागणी‎ पांडेपोखरी येथील शेतकरी कृष्णा‎ गोरे यांनी केली. दरम्यान, या‎ अवकाळी पावसामुळे गहू आणि‎ मका पिकासह हरभऱ्याचेही मोठे‎ नुकसान झाले आहे. अवकाळी‎ पावसामुळे रब्बी हंगामात पेरलेल्या‎ गहू हरभरा पिकासह बहर आलेल्या‎ आंबा फळबागांचे मोठे नुकसान‎ झालेले आहे. आधीच शेतकरी‎ शेतमालाला भाव नसल्यामुळे‎ हवालदि ल झालेला असताना त्यात‎ पुन्हा संकटात भर पडली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...