आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेस्ट ऑफ लक:परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना केवळ कंपास,‎ पेन, पॅड, पाण्याची बॉटल नेण्याची मुभा‎

जालना‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक‎ शिक्षण मंडळातर्फे आजपासून इयत्ता‎ दहावीच्या परीक्षा सुरू होत असून, पहिला‎ पेपर मराठी विषयाचा आहे. जिल्ह्यातील १००‎ केंद्रांवर ३० हजार ३५० विद्यार्थी या परीक्षेस‎ बसणार आहेत. इयत्ता बारावीप्रमाणेच इयत्ता‎ दहावीची परीक्षाही कॉपीमुक्त वातावरणात‎ पार पडावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ.‎ विजय राठोड यांच्या आदेशानुसार १८ भरारी‎ पथके नेमण्यात आली असून, संवेदनशील‎ ५० केंद्रांवर बैठे पथक तसेच पोलिसांचा‎ फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.‎ दरम्यान, परीक्षा केंद्रात पेन, पॅड व पाण्याची‎ बॉटली नेण्याची मुभा देण्यात आली आहे.‎ नियोजित वेळापत्रकानुसार विषयनिहाय‎ सकाळी ११ ते दुपारी १, ११ ते १.३०, ११ ते २ व‎ दुपारी ३ ते ६ अशी या परीक्षेची वेळ असणार‎ आहे. मात्र परीक्षा केंद्रांवर पेपर सुरू‎ होण्यापूर्वी किमान ३० मिनिटे अगोदर‎ परीक्षार्थींना पोहोचावे लागणार आहे.

२ ते २५‎ मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेत पहिला पेपर‎ मराठीचा तर शेवटचा पेपर भूगोल विषयाचा‎ असेल. दरम्यान, आयुष्याला वळण देणारी‎ ही परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी‎ काळजीपूर्वक पेपर सोडवावेत, कुणीही‎ कॉपी करू नये अशा प्रकारच्या सूचना‎ जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या‎ आहेत.‎ कॉपीमुक्ती अभियानाची यशस्वी‎ अंमलबजावणी व्हावी. यासाठी‎ संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व‎ पालकांच्या वेळोवेळी बैठका घेऊन त्यांनाही‎ याबाबत अवगत करण्यात आले आहे.

मात्र,‎ यापूर्वीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन काही‎ संवेदनशील केंद्रांची निवड करत त्या‎ ठिकाणी बैठे पथक, भरारी पथकांसोबत‎ पोलिसांचा चोख बंदोबस्तही तैनात करण्यात‎ आलेला आहे. परीक्षा शांततापूर्ण‎ वातावरणात पार पडावी यासाठी अपर‎ जिल्हा दंडाधिकारी केशव नेटके यांनी १ ते‎ १५ मार्चपर्यंत जमावबंदी व प्रतिबंधात्मक‎ आदेश दिले आहेत.‎

या वस्तूंना परीक्षा केंद्रात नेण्यास‎ असणार मज्जाव‎‎
परीक्षार्थींना परीक्षा हॉलमध्ये जाताना‎ कोरा कागद,कॅल्युलेट‎,माेब‎ ाइल,इलेक्ट्राॅनिक्स‎ घड्याळ या वस्तू नेण्यास मज्जाव‎ असेल. फक्त‎ कंपास,पेन, पाण्याची बाटली, पॅड, हाॅल तिकीट, शाळेचे आेळखपत्र सोबत‎‎ नेता येईल. या व्यतीरिक्त परीक्षा‎ हॉलमध्ये एकही वस्तू नेता येणार‎ नाही.‎‎

आनंदाने पेपर सोडवा‎
विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या‎ अभ्यासानुसार आनंदाने पेपर‎ सोडवावेत, परीक्षेचा ताण घेऊ नये.‎ ज्या नोट्स काढलेल्या आहेत,‎ त्याची एक दिवस अगोदर उजळणी‎ करावी. पालकांनी दबाव न आणता‎ हसतमुखाने विद्यार्थ्यांशी संवाद‎ साधावा, परीक्षेला शुभेच्छा‎ द्याव्यात.‎ -डॉ. प्रकाश अंबेकर,‎ मानसोपचारतज्ज्ञ‎

१३ दिवस सुट्यांमुळे‎ उजळणीची संधी‎
२, ३, ४, ६, ८, १०, १३, १५, १७,‎ २०, २३ व २५ असे १२ दिवस पेपर‎ होणार असून, सुरुवातीचे तीन‎ पेपर वगळता इतर पेपरांच्या मध्ये‎ एक किंवा दोन सुट्या आलेल्या‎ आहेत. अर्थात आतापर्यंत‎ केलेल्या अभ्यासाची उजळणी‎ किंवा महत्त्वाच्या मुद्द्यांचा सराव‎ करण्याची संधी यामुळे‎ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...