आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण भागात एकमेकांना सहकार्य करणारे लोक असतात, तसेच गावामधील संस्कृती ही एक आदर्श संस्कृती असते, तिचा विद्यार्थ्यांनी नीट अभ्यास करून. गावातील समस्या ओळखून त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा आणि गावाचा विकास साधावा, असे मत परिवर्तन एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅड. ब्रह्मानंद चव्हाण यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाने जालना तालुक्यातील सामनगाव तेथे आयोजित केलेल्या ग्रामीण शिबिरात ते बोलत होते.
शिबिराचे उद्घाटन सिनेट सदस्य प्रा. चत्रभुज गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. प्रविण कनकुटे, कांबळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. ग्रामीण शिबिराचे आयोजन महात्मा जोतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत कुमार वनंजे यांनी केले. सूत्रसंचालन वैशाली साळवे यांनी तर संदेश म्हस्के यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.