आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरतूर तालुक्यातील बाणाची वाडी येथे आठ शेतकऱ्यांचा जवळपास वीस एकर ऊसाच्या फडाला गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाला आहे.
आष्टी परिसरात ऊस तोडणीची तारीख उलटूनही साखर कारखाना ऊस नेत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यात अशा घटना घडतात. यावेळी परतूर येथील नगर परिषदेची अग्निशामक गाडी पाचारण करण्यात आल्याने आग आटोक्यात आली.
या आगीत नानाभाऊ संपत्ती बाण यांचा अडीच एकर, रंगनाथ संपत्ती बाण यांचा अडीच एकर, रामकिसन बाबादेव बाण यांचा साडेतीन ऐकर, बबन कोंडीबा कुराडे यांचा तीन एकर,धोंडीबा सुंदर चौगुले यांचा तीन एकर,सुजान रामचंद्र चौगुले यांचातीन एकर तर प्रकाश पवार यांचा दोन एकर ऊस जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.