आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने घनसावंगीच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येऊन मागण्यांची अंमलबजावणी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले, बियाणांची चढ्या दराने होणारी विक्री थांबवावी, प्रत्येक कृषी आस्थापन केंद्रावर खते व बियाण्यांचे भाव फलक लावण्यात यावे, शेतकऱ्यांना बियाणे व खत खरेदी याची पक्की पावती न देणार्या दुकानदारावर कारवाई करण्यात यावी, खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात येऊ नये, शेतकऱ्यांना आवश्यक तेवढेच खत खरेदी करण्याचा त्यांचा अधिकार असून त्यामुळे लिंकिंग प्रमाणे खत विक्री करणार्यावर कडक कारवाई करण्यात यावी, बोगस बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारावर व कंपनीवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र भागडे, जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव, नगरसेवक देवनाथ जाधव, किशोर मरकड, यांच्यासह अशोक जाधव, आशिष बोरडे, रामेश्वर गरड, ज्ञानेश्वर उढाण यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.