आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:"रंगोत्सव साजरा करताना‎ वीज सुरक्षेची घ्या खबरदारी''‎

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळी व धूलिवंदन हा वसंत ऋतूचा‎ स्वागतोत्सव आहे. होळी पेटवताना व रंगांची उधळण‎ करताना नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी‎ घ्यावी आणि सणाचा आनंद द्विगुणित करावे, असे‎ आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. होळी‎ पेटवताना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण‎ रोहित्रे नाहीत याची खातरजमा करून घ्या, अन्यथा‎ होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार‎ खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते.‎ याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत‎ असल्याने, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी‎ जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भूमिगत वीजवाहिन्या‎ सुरक्षित राहतील. होळीसाठी शक्यतो मोकळ्या जागेचा‎ वापर करा.

ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणताना‎ होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार‎ नाही याची खबरदारी घ्या. त्याचप्रमाणे धुळवडीस‎ रंगोत्सव साजरा करताना पाण्याचे फवारे वीजवाहिन्‎ यांपर्यंत उडणार नाहीत याची काळजी घ्या. शक्यतो रंग‎ भरलेले फुगे फेकू नका. रंग उडवताना ते विजेचे खांब‎ आणि वीजवाहिन्या यांना लागणार नाहीत याची‎ खबरदारी घ्यावी. वीज वितरण यंत्रणेची रोहित्रे व‎ तत्सम वितरण उपकरणे बसविलेल्या जागेपासून लांब‎ अंतरावरच रंग खेळा. रंग खेळताना ओल्याचिंब‎ शरीराने वीज खांबाला स्पर्श झाल्यास अपघाताचा‎ धोका संभवतो. त्यामुळे विजेच्या खांबांना स्पर्श करू‎ नका. विजेच्या खांबांभोवती पाण्याचा निचरा होणार‎ नाही याची खबरदारी घ्या. घरात रंग खेळताना वीज‎ मीटर, प्लग, वीजतारा आणि वीज उपकरणांचा‎ पाण्यापासून बचाव करा. ओल्या हाताने विजेच्या‎ बटनांना स्पर्श करू नका. अशी काळजी घेण्याचे‎ आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...