आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभिमाकोरेगाव लढा मानव मुक्तीसाठी लढला गेला असल्याचे प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के यांनी सांगितले. तक्षशिला बुद्ध विहारात भीमा कोरेगाव येथील शौर्य गाजवणाऱ्या शूरवीराच्या गुणगौरव करण्यासाठी आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत हाेते. यावेळी भिकाजी साळवे, प्रा. एस. एन. कांबळे, सरणागत, बी. के. बोर्डे आदींची उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. म्हस्के म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये समता व सामाजिक न्याय व बंधुभाव लोककल्यानासह महिला वृद्धांचे संरक्षण केल्या जायचे. त्याकाळी अन्यायाविरुद्ध न्याय मिळत होता. अशा रयतेच्या राज्यामध्ये जनतासुखा समृद्धीने नांदत होती. परंतु मनू व्यवस्थेच्या प्रस्थापित पेशवाईंनी रयतेच्या स्वराज्याच्या रक्षण न करता स्वराज्याचा नाश केला.
ज्या विचारातून स्वराज्याचा नाश झाला त्याच मनुवादी पेशवाई विचाराच्या विरोधात व छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या राज्याचे पुर्नर निर्माण व्हावे व माणसाला माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावे. यासाठी भीमा कोरेगावचा लढा शूरवीरांनी लढला असल्याचे सांगितले. यावेळी संबोधी इंगोले हिने गीतगायन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.