आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समिती स्थापन:अदानीच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी‎ केंद्राने संसदीय समितीची स्थापन करावी‎

भोकरदन‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अदानीच्या गैरकारभाराचा भंडाफोड‎ झाला असुन तब्बल ७ लाख कोटी‎ रूपयांचे नुकसान झाले आहे. केंद्र‎ (मोदी) सरकारने अदानी यांच्या उद्योग‎ समुहात एसबीआय, एलआयसी व झतर‎ सरकारी वित्तीय संस्थांचा पैसा बुडण्याची‎ भीती निर्माण झाली आहे. हा पैसा सुरक्षित‎ राहावा व गौतम अदानीच्या‎ गैरकारभाराची चौकशी करावी या मागणी‎ साठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे‎ प्रदेशाध्यक्ष आ नानाभाऊ पटोले यांच्या‎ आदेशानुसार जालना जिल्हा काँग्रेस‎ कमिटी कडून जिल्हाभर आंदोलन‎ करनार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ‎ देशमुख यांनी सांगितले.

भोकरदन येथे‎ तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी द्वारे‎ शहरातील एसबीआय बँकेच्या समोर‎ धरणे आंदोलन करण्यात आले या‎ आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष‎ राजाभाऊ देशमुख, तालुकाध्यक्ष‎ त्रिंबकराव पाबळे, प्रदेश पदाधिकारी‎ भाऊसाहेब सोळुंके, अनिल देशपांडे,‎ युवक जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, संतोष‎ अन्नदाते, उपनगराध्यक्ष इरफान‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सिद्दीकी,शेख रिझवान, चंद्रकांत पगारे,‎ महेश दसपुते, शालीकराम गावंडे,‎ दादाराव भोंबे, दादाराव देशमुख, शेख‎ सलीम, विष्णु भालेराव, सुखदेव‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रावळकर, कैलास सुरडकर,आजीज‎ पार्टी, अनिल पगारे, रमेश जाधव, सोपान‎ सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे आजी‎ माजी पदाधिकारी उपस्थित होते‎

भोकरदनच्या एसबीआयसमोर केले आंदोलन‎ उद्योगपती गौतम अदाणी यांच्या उद्योगसमूहावर ‘हिंडेनबर्ग’ने गंभीर आरोप केले आहेत.‎ अदानीप्रवर्तीत उद्योगसमूहाने दशकांपासून ताळेबंदात आणि लेखांमध्ये गैरप्रकार केल्याचं‎ अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार संस्था ‘हिंडेनबर्ग’च्या एका अहवालात म्हटलं आहे.‎ यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. अदाणी समूहाच्या चौकशीची मागणी केली आहे.‎ त्याच पार्श्वभूमीवर देशभरात भारतीय जीवन आयुर्विमा ( एलआयसी ) आणि स्टेट बँक‎ ऑफ इंडियाच्या शाखांसमोर आंदोलन करण्यात आलं.‎

बातम्या आणखी आहेत...