आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:बाल साहित्य संमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या‎ भावविश्वाला नक्कीच चालना मिळेल‎

जालना23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहान मुलांचे भावविश्व खूप वेगळे‎ असते. आपल्याला ते जाणून उमजून घेणे‎ फार गरजेचे असते. जर आपण ते समजून‎ घेतले तरच त्यांचे बालपण कोमेजून‎ जाण्याऐवजी अबाधित राहील. लहान‎ मुले ही मातीच्या गोळ्यासारखी‎ असतात.आपण जसा आकार देऊ तशी‎ ती घडत जातात पण यासाठी त्यांना हाच‎ आकार हवा, हाच आकार त्यांच्यासाठी‎ योग्य आहे. असा अट्टाहास मात्र करू‎ नये. त्यांना जसे हवे तसे घडू द्यावे आणि‎ हे काम सावरगाव हडप केंद्राने आयोजित‎ बिटस्तरीय बालसाहित्य संमेलनाच्या‎ माध्यमातून करुन दाखवले असे प्रतिपादन‎ जालना पंचायत समितीच्या‎ गटशिक्षणाधिकारी आसावरी काळे यांनी‎ केले.‎ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद‎ जालना वर्षा मीना, शिक्षणाधिकारी‎ प्राथमिक कैलास दातखिळ,‎ शिक्षणाधिकारी माध्यमिक मंगल धूपे,‎ गटशिक्षणाधिकारी पं.स. जालना‎ आसावरी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली‎ २८ फेब्रुवारी रोजी सावरगाव हडप बीटचे‎ बीट स्तरीय शैक्षणिक बालसाहित्य‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संमेलन २०२३ साहित्याचे बीजांकुरण या‎ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत‎ होत्या.

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी‎ डॉ. भरत वानखेडे, प्रसिद्ध कवयित्री डॉ.‎ संजीवनी तडेगावकर, जेष्ठ चित्रकार‎ श्रीधर आंभोरे, वरिष्ठ अधिव्याख्याता‎ डायट जालना प्रा. संजय येवते, प्रा. डॉ.‎ यशवंत सोनुने, जालना अधिव्याख्याता‎ डायट जालना योगेश जाधव,‎ गटसमन्वयक जालना पी. आर. जाधव,‎ केंद्र प्रमुख नेर बी. बी. पवार, डॉ. करुणा‎ हिवाळे, सी. बी. जाधव, मुख्याध्यापिका‎ शिवाजी विद्यालय हस्तेपिंपळगाव भांबरे,‎ जीजा वाघ (कवी), आरती जोशी,‎ पंडित लव्हटे, राजेन्द्र शेळके, सतीष‎ श्रीखंडे, प्रणिता लव्हटे, प्रमोद साठेवाड,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अनिल कुरकुटे यांची उपस्थिती होती. या‎ बाल साहित्य संमेलनाचे प्रमुख संयोजक‎ डॉ. भरत वानखेडे शिक्षण विस्तार‎ अधिकारी प्रास्ताविकात म्हणाले की,‎ शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे‎ साधन नसून त्यामधून आपल्या‎ भावभावनांचे प्रकटीकरण, अनुभवलेल्या‎ भाव विश्वाचे चित्रण करता येणे किंबहुना‎ संभाषणातून लेखनातून व्यक्त होता येणे‎ अपेक्षित आहे.

यासाठी साहित्याचे‎ बीजांकुरण हे साहित्य संमेलन उपयुक्त‎ ठरणार आहे. सावरगाव हडप बीट मधील‎ सर्व शिक्षक यांचे सोबत केंद्र प्रमुख यांच्या‎ सहकार्याने वेळोवेळी मार्गदर्शन‎ कार्यशाळा घेण्यात आल्या त्याचीच‎ फलश्रुती म्हणून सावरगाव हडप बीट‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मधील केंद्र सावरगाव हडप,‎ सिंधीकाळेगाव, उटवद आणि सावंगी‎ तलाव केंद्रातील जिल्हा परिषद शाळेतील‎ १३४ विद्यार्थ्यांनी कवीता, गवळण,‎ चारोळ्या, कथा, गोष्ट, पवाडा, गोष्ट‎ ग्रामीण नृत्य इत्यादी कलागुणांच्या‎ माध्यमातून सादरीकरण करण्यात आले.‎ कार्यक्रम यशस्वीतेसाठी सावरगाव केंद्र‎ प्रमुख सुभाष सातपुते, सुजाता भालेराव,‎ भागवत जटेवाड, अशोक उबाळे, सुनील‎ ढाकरगे, रनशुर सर, के. एल पगारे,‎ लक्ष्मण मुळे, मुख्याध्यापक भाटेपुरी,‎ विनोद तिळवणे, मंडपे, सुरवाडे, एकनाथ‎ मुळे, कुसूम पर्यटन केंद्र सिंधीकाळेगाव,‎ सरपंच सिंधीकाळेगाव, अध्यक्ष, आदींचे‎ सहकार्य लाभले.‎

बाल साहित्य संमेलन अनोखे‎
प्रसिद्ध कवयित्री डॉ. संजिवनी‎ तडेगावकर बोलतांना म्हणाल्या की,‎ भविष्यातील लेखक कलावंत शिक्षका‎ हाती उद्याचा निर्माण होणारा कवी‎ कलावंत लेखक हा अभ्यासक्रमापेक्षा‎ शिक्षक घडवित असतो. याची असंख्य‎ उदाहरणे आहेत जे शिक्षकामुळे घडले‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...