आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआसाममध्ये सीमा सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले वडीगोद्री येथील हनुमान यशवंता लिपणे (४३) यांच्या दुचाकीला (एमएच २१ एजे ५७९९) पाठीमागून येणाऱ्या पिकअपने (एमएच ०६ एजी ७५६९) जाेराची धडक दिली. यात ते जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भालगाव फाट्यावर घडली.
हनुमान लिपणे यांच्या मुलीचा चार दिवसांपूर्वी विवाह पार पडला हाेता. रविवारपर्यंत ते सुटीवर आले होते. औरंगाबाद येथे शिक्षण घेत असलेल्या मुलाच्या शाळेची फी जमा करून तसेच भेट घेत दुचाकीवरून वडीगोद्रीकडे येत असताना ही घटना घडली. दरम्यान, शनिवारी त्यांच्यावर वडीगोद्री येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. लिपणे यांच्या पत्नीचेही निधन झालेले अाहे. यामुळे त्यांच्या मुलगा व मुलीचेही छत्र हरवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.