आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:महिला सुरक्षेबाबतच्या कायद्याची‎ अंमलबजावणी करावी : पवार‎

जालना‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा महिला‎ सुरक्षेबाबतच्या कायद्याची नीटपणे‎ अंमलबजावणी करीत नसल्याची‎ तक्रार जालना जिल्हा महिला‎ काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नंदा‎ पवार यांनी राज्य महिला‎ आयोगाच्या अध्यक्षा रूपाली‎ चाकणकर यांच्याकडे केली आहे.‎ महिलांवरील वाढते अत्याचार‎ रोखण्याची मागणीही केली .‎ राज्य महिला आयोगाच्या‎ जनसुनावणी दरम्यान पवार यांनी‎ सौ. चाकणकर यांची भेट घेऊन‎ त्यांना निवेदन सादर केले.

जालना‎ जिल्ह्यात गेल्या पाच वर्षापासून‎ महिलावरील अन्याय- अत्याचाराचे‎ प्रकार सुरू आहेत.अनेक महिला‎ ह्या दिवसाढवळ्या गायब होत‎ आहेत ,महिला व युवतींचे विनयभंग‎ हे राजरोसपणे होत आहेत.सन २०२२‎ मध्ये जालना जिल्ह्यात‎ बलात्काराच्या ९४ घटना घडल्या‎ आहेत. हुंड्यासाठी ५०३ विवाहित‎ महिलांच्या शारीरिक व मानसिक‎ छळाच्या घटना घडल्या आहेत. ७२‎ तरूणी व महिलांचे अपहरण झाले‎ आहे. तर ४०० महिलांचे विनयभंग‎ झाले आहेत. महिला अत्याचाराच्या‎ घटना वाढत असताना पोलीस‎ प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत‎ असून आंधळेपणाचे सोंग घेत‎ आहे. असे म्हटले.‎

बातम्या आणखी आहेत...