आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्यांनी आपल्या कंठा मध्ये कृष्ण नाम रूपी मणी धारण केला त्यांचे जीवन प्रकाशमान होऊन त्यांचा प्रकाश अवघ्या जगात पडला. त्यामुळे मनुष्याने जीवनात कोणतेही नाम कंठात घ्यावे, आपली चित्त शुद्धी झाल्याशिवाय राहणार नाही, असा उपदेश गुरुवर्य श्री माउ ली महाराज चातुर्मास्ये यांनी केला. श्रीक्षेत्र अन्वा येथे सुरू असलेल्या माघी उत्सवाची सांगता संत सद्गुरु विठोबा दादा महाराज चातुर्मास्ये श्री रुक्मिणी पांडुरंग संस्थानचे पंधरावे विद्यमान अधिपती गुरुवर्य ज्ञानेश्वर माउली चातुर्मास्ये यांच्या काल्याच्या कीर्तनाने शुक्रवारी दि.३ झाली.
यावेळी महाराजांनी //" कंठी धरीला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू, एकमेका वैष्णव निका संभ्रम//" या जगदगुरू संत तुकोबारायांच्या अभंगाचे काल्याच्या कीर्तनसेवेत सुंदर निरुपण केले. गुरुवर्य माउली महाराज पुढे म्हणाले की, वैकुंठामधील देवादिकांना दुर्लभ असणारा काला प्रसाद सद्गुरु संत कृपेने प्राप्त होतो. श्रीकृष्ण चरित्रातील ‘गोपाळकाला'' हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतार कार्याचे प्रतिनिधीत्व करतो. काल्यातील प्रमुख घटक पोहे, दही, दूध,अभंगावर ताक व लोणी हे हे प्रमुख घटक त्या-त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत.
पोहे वस्तुनिष्ठ गोप भक्तीचे प्रतीक, दही वात्सल्य भावातून प्रसंगी शिक्षा करणाऱ्या मातृ भक्तीचे प्रतीक दूध हे गोपींच्या सहज सगुण मधुरा भक्तीचे प्रतिक अाहे. गोपींच्या विरोध भक्तीचे प्रतीक लोणी हे सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुण भक्तीचे प्रतीक आहे. या दिवशी ब्रह्मांडात कृष्ण तत्त्वाच्या आपत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात असे सांगितले. यावेळी कैवल्य महाराज महाराज चातुर्मास्ये, परमेश्वर महाराज गाेंडखेडकर,राधेश्याम महाराज चातुर्मास्ये, राज महाराज चातुर्मास्ये, संदीप महाराज वाडेकर यांच्यासह पंचक्रोशीतील गुरूभक्त माेठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दहीहंडी फोडून उपस्थित भाविकांना काल्याचा प्रसाद देण्यात आला.
जड अंत:करणाने गुरूभक्तांनी घेतला अन्व्याचा निराेप संत सद्गुरु विठोबा दादा महाराज चातुर्मास्ये श्री रुख्मिणी पांडुरंग संस्थानच्या वतीने माघी उत्सवानिमित्त मंगळवार दि.३१ जानेवारी ते शुक्रवार ३ फेब्रुवारी दरम्यान रोज गुरुवर्यांचे कीर्तन, पांडुरंगाची रथातून मिरवणुक, नगरप्रदक्षिणा, हरिजागर, महाप्रसाद, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठवाडा,खान्देश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य प्रदेशातून चार दिवस गुरू भक्त मोठ्या संख्येने अन्वा येथे दाखल झाले होते. शुक्रवारी माऊली महाराजांच्या हस्ते काल्याचा प्रसाद घेऊन गुरू भक्तांनी जड अंत:करणाने अन्व्याचा निरोप घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.