आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन‎:बलशाली राष्ट्रनिर्मितीसाठी‎ प्रेरक इतिहासाची गरज‎

सेलू‎7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या भारताला बलशाली राष्ट्र‎ बनविण्यासाठी राष्ट्रभक्ती व समर्पणभाव‎ असलेली तरूण पिढी घडविण्याची खरी‎ गरज आहे. ही पिढी आपल्या प्रेरणादायी‎ इतिहासाची ओळख व संस्कारांतून घडेल‎ असा विश्वास महाराष्ट्र इतिहास संकलन‎ समितीचे सदस्य भास्करराव ब्रह्मनाथकर‎ यांनी केले.‎ भारतीय शिक्षण प्रसारक संस्था‎ अंबाजोगाई संचलित स्वामीविवेकानंद‎ संस्कार केंद्र आयोजित व देवगिरी नागरी‎ सहकारी बँक मर्यादित.संभाजीनगर‎ प्रायोजित केलेल्या स्व.जनुभाऊ रानडे स्मृती‎ व्याख्यानमालेत ११ व्या वर्षातील दुसरे पुष्प‎ हैद्राबाद मुक्ती संग्राम या विषयावरील‎ व्याख्यानात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या‎ अध्यक्षस्थानी भा.शि.प्र.संस्थेचे अध्यक्ष‎ डाॅ.सुरेंद्र अलुरकर होते. व्यासपीठावर‎ संयोजक हरिभाऊ चौधरी, उपेंद्र बेलूरकर‎ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात‎ कल्याणी पाठक हिने गायीलेल्या बलसागर‎ भारत होवो //" या गीताने झाली.‎ सूत्रसंचालन अभिषेक राजूरकर यांनी केले.‎ मान्यवरांचा परिचय व प्रास्ताविक हरिभाऊ‎ चौधरी यांनी केले. करूणा कुलकर्णी यांनी‎ आभार मानले. व्याख्यानासाठी सेलू‎ शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली‎ होती. कार्यक्रमासाठी स्वामी विवेकानंद‎ संस्कार केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम‎ घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...