आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील आयटीआयकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून मागील अनेक वर्षापासून विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरच पंचायत समिती कार्यालय, कस्तुरबा गांधी विद्यालय असून पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून वाट काढावी लागते अशी रस्त्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या रस्त्यावर सर्वात शेवटी आयटीआय असून मंठा तालुका व तालुक्याच्या बाहेरील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी आयटीआयमध्ये येतात. या आयटीआयमधील उत्कृष्ट शिक्षणाची व नियोजनाची महाराष्ट्र शासनाने दखल घेतलेली आहे.
मात्र आयटीआय, पंचायत समिती कार्यालय व कस्तुरबा गांधी विद्यालयाकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता असून पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल होतो. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत विद्यार्थ्यांसह पालकांनीही अनेकदा संबधित विभागासह लोकप्रतिनिधीकडे वारंवार तक्रारीही केलेल्या आहेत. परंतु कुणीच गांभीर्याने घेतले नसल्याने रस्त्याची वाताहात झाली आहे. दरम्यान, रेणुकामाता मंदिर, तहसील कार्यालयकडे जाणाऱ्या रस्त्यासह आयटीआय, पंचायत समिती कार्यालय व कस्तुरबा गांधी विद्यालयकडे जाणारा रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे .
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.