आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणात बदल:ज्वारी, हरभरा, गव्हाच्या काढणीसाठी‎ बळीराजाची धावपळ झाली सुरू

मंठा‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवामान विभागामार्फत अवकाळी‎ पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात‎ आला आहे. यासह तालुक्यांमध्ये सध्या‎ ढगाळ वातावरण झाले असल्याने‎ शेतकऱ्यावर चिंतेचे ढग पसरलेले‎ दिसून येत आहे. सध्या काढणीला‎ आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा व‎ भाजीपाला पिकाला फाटका बसण्याची‎ शक्यता वर्तवली जात आहे.मागील‎ आठवड्यात बेमोसमी पावसाने हजेरी‎ लावल्याने रब्बी हंगामातील पिके‎ आडवी झाल्याची दिसून येत आहे.‎ खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच‎ शेतकऱ्यांना सुलतानी व अस्मानी‎ संकटाचा सामना करावा लागत आहे.‎ खरीप हंगामातील पिकाची पेरणी व‎ लागवड केल्यानंतर पावसाने उघडीप‎ दिली होती. त्यानंतर पुन्हा‎ अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील‎ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.‎ यानंतर सोयाबीन, मूग, उडीद व‎ कपासावर विविध रोगराईचे संकट उभे‎ राहिले होते. तसेच शेतीमालाचे‎ अपेक्षित भाव वाढत नसल्याने शेतकरी‎ दुहेरी संकटात सापडले आहे.

खरीप‎ हंगामातील नुकसान भरून‎ काढण्यासाठी शेतकऱ्यांची रब्बी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ हंगामावर मोठे अपेक्षा होती. परंतु, त्यात‎ आता रब्बी हंगामात देखील काढणीच्या‎ वेळीच ढगाळ वातावरणामुळे‎ शेतकऱ्यावर आस्मानी संकटाचे ढग‎ आलेले दिसून येत आहे. तालुक्यामध्ये‎ गेल्या महिन्यापासून रब्बी हंगामातील‎ पिके काढणीला वेग आला‎ आहे.अतिवृष्टीमुळे उशिरा पेरणी‎ झालेली रब्बी हंगामातील पिके सध्या‎ काढलेला आलेली आहेत. तालुक्यात‎ गहू, ज्वारी व हरभरा यासह अन्य‎ पिकाची काढणी व मळणी करण्या‎ शेतकरी व्यस्त आहेत. हवामान‎ खात्याकडून पावसाचा अंदाज‎ वर्तविण्यात आला असून तालुक्यात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ढगाळ वातावरण झाल्याने शेतकऱ्यांची‎ चिंता वाढली आहे.‎

मागील आठवड्यामध्ये रिमझिम पाऊस‎ झाला यात उभी पिके आडवी झाल्याने‎ शेतकऱ्यांना आता हार्वेस्टर यंत्राचा‎ वापर न करता हाताने काढणी व मळणी‎ करावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सोसावा लागत आहे. त्यात पुन्हा आता‎ अवकाळी पावसाची चिंता शेतकऱ्यांना‎ सतावत आहे. तालुक्यामध्ये सर्व‎ शेतातील कामे एकाच वेळी आल्याने‎ शेतमजुराची टंचाई देखील जाणवत‎ असल्याचे गेवराई येथील शेतकरी‎ सांगत आहेत.‎

मजुरीचे दर वाढले‎
रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकाची शेतमजुरांना २५० ते ३०० रूपये मजुरी‎ द्यावी लागत आहे. किंवा काढणीच्या मोबदल्यात धान्यही देण्यात येते. तसेच मळणी‎ यंत्रातून गहू व हरभरा तयार करण्याकरिता एक पायली अशी मजुरी द्यावी लागत‎ आहे.त्याचबरोबर ज्वारी काढणी व मळणी करण्याकरिता होणाऱ्या धान्यातील‎ आठवा हिस्सा द्यावा लागत असल्याचे गेवराई येथील शरद खरात यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...