आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण‎:जळगाव सपकाळ ग्रामस्थांनी‎ केले महावितरणसमोर उपोषण‎

भोकरदन‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जळगाव सपकाळ‎ गावात गेल्या दोन महिन्यापासून‎ रोहित्र अक्षरक्ष पुर्णपणे जळालेले‎ असताना देखील महावितरण‎ कार्यालयाने याकडे जाणीवपूर्वक‎ दुर्लक्ष केले असल्याने गावातील‎ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत‎ असल्यामुळे जळगाव सपकाळ‎ येथील ग्रामपंचायत कार्यालयाने‎ वेळोवेळी निवेदनामार्फत मागणी‎ करून देखील राजकिय सुडबुद्दीने‎ गावाला वेठीस धरण्याचे काम‎ भोकरदन येथील महावितरण‎ कार्यालयाने केल्यामुळे ग्रामस्थांनी‎ आमरण उपोषणाचे हत्यार उपसले.‎ भोकरदन येथील महावितरण‎ कार्यालयासमोर गुरुवारपासून‎ शेकडो ग्रामस्थांनी उपोषणाला‎ सुरुवात केली.

दरम्यान,‎ महावितरण कार्यालयाच्या‎ अधिकाऱ्यांनी तातडीने सहा तर‎ दोन दिवसानंतर चार रोहित्र दुरुस्त‎ करून देण्याचे तसेच एक्सप्रेस‎ फिटर बसवण्याचे लेखी आश्वासन‎ दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.‎ प्रभारी उपअभियंता दारखंडे‎ यांनी सरपंच व उपसरपंच तसेच‎ गावकरी यांना लिंबू पाणी देऊन‎ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते सुधाकर‎ दानवे व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष‎ त्र्यंबक पाबळे यांच्या उपस्थितीमध्ये‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ उपोषण सोडविले.

येणाऱ्या दहा‎ दिवसांच्या आत पाच मागण्या पूर्ण‎ न केल्यास गावातील महिला‎ भोकरदन येथील महावितरण‎ कार्यालयावर चप्पला मोर्चा‎ काढणार असल्याचा इशारा सरपंच‎ विशाखा साळवे यांनी दिला.‎ उपविभागिय उपअभियंता यांना‎ दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे‎ की, भोकरदन तालुक्यातील‎ जळगांव सपकाळ हे सर्वात मोठे‎ पंधरा हजार लोकसंख्येचे तसेच‎ बाजारपेठेच गाव असून सदरिल‎ संपूर्ण गावामध्ये वीस वर्षापूर्वी‎ सिंगल फेज योजनेअंतर्गत‎ वीजपुरवठा करण्यात आला होता.‎ परंतु सदरिल वीजपुरवठा पूर्णपणे‎ विस्कळीत झालेला आहे.‎

वारंवार रोहित्रांमध्ये बिघाड होणे,‎ गावांतर्गत खांबावरील संपूर्ण तार‎ जीर्ण झालेल्या आहेत. पूर्ण पोलही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जीर्ण होऊन तुटलेले आहेत.‎ भोकरदन तालुक्यामध्ये बऱ्याच‎ युनिटला एक्सप्रेस फिटर योजना‎ मंजुर होऊन चालू झाली. परंतु‎ आन्वा मुनिट मधील कोणत्याही‎ गावामध्ये तसेच तालुक्यातील‎ सर्वात मोठे गाव जळगांव सपकाळ‎ येथे अद्यापपर्यंत एक्सप्रेस फिटर‎ योजना झालेली नसल्याने सदरिल‎ गावांतील विजपुरवठा वारंवार‎ खंडीत होत आहे, असे म्हटले‎ आहे. यावेळी राष्ट्रवादीचे‎ तालुकाध्यक्ष रमेश सपकाळ, प्रा.‎ अंकुश जाधव, डॉ. शालीकराम‎ सपकाळ, बि. एन. कड, महिला‎ तालुकाध्यक्ष सुनिता सावंत,‎ शहराध्यक्षा कमलताई जेठे,‎ सोनाबाई कोल्हे, उपसरपंच‎ रुख्मणबाई सपकाळ, सरपंच रमेश‎ बरडे, अब्दुल कदिर बापु, शमीम‎ मिर्झा, हबीब शेठ आदी होते.‎

बातम्या आणखी आहेत...