आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशनिवारी रात्रीच्या वेळी भोकरदन शिवारातील कुंभारी येथे बहिण, भाऊजी यांचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर भाऊ सुनील साखळे याने नातेवाईकांबरेाबर घटनास्थळ गाठले. येथे बहिणीचा ट्रॅक्टरच्या चाकामध्ये मृतदेह आढळला. तर या ठिकाणी इतरत्र बहिणीचा एकही नातेवाईक नसल्याने हा घातपात असल्याची फिर्याद मृत महिलेच्या भावाने भोकरदन पोलिसांत दिली. या प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिल्लोड येथील तहसिल कार्यालयात कोतवाल पदावर असलेल्या कविता आढाव (२६) या पती गजानन आढाव यांच्यासह हसनाबाद येथे राहत होत्या. ३१ डिसेंबर रोजी दोघांचा अपघात झाल्याची माहिती भाऊ सुनिल साखळे यांना मिळाली. यानुसार त्यांनी घटनास्थळ गाठले असता हा घातपात असल्याचा त्यांना संशय झाला. हा प्रकार बहिणीच्या सासरच्या मंडळीनी केला असल्याची फिर्याद भोकरदन पोलिस ठाण्यात दिली.
या प्रकरणी मृत महिला कविता आढावचे भाऊ सुनील साखरे यांनी तक्रार दिल्यानंतर पती गजानन रघुनाथ आढाव (रा. पालपाथ्री तालुका, फुलंब्री), सासू कौशल्या रघुनाथ आढाव, नणंद अरुणा नारायण जाधव, ताराबाई बाळा, मीरा जनार्दन चव्हाण, शीला गजानन कोंडके, घटनास्थळावरून फरार झालेला ट्रॅक्टरचा चालक, यांच्या विरोधात तक्रार दिल्याने भोकरदन पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास फौजदार बी. डी. कुटुंबरे हे करीत आहेत.
दोन वर्षांपूर्वी झाला होता महिलेचा विवाह
दोन वर्षांपूर्वी कविता हिचा गजानन आढाव यांच्यासोबत विवाह झाला होता. पती औरंगाबादेत तर पत्नी सिल्लोड येथे नोकरी करत होती. दरम्यान, कविताला सासरची मंडळी मानसिक शारीरिक त्रास देत होते. घर बांधकामासाठी पाच लाख रुपयांची मागणीही करत होते. त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. नुकतेच हे दोघे पती - पत्नी हसनाबाद येथे राहायलाही आले होते. सासरच्या मंडळींनी संगनमत करूनच आपल्या बहिणीचा घातपात केल्याचे तक्रारीत मृत महिलेच्या भावाने म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.