आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधारूर तालुक्यातील हिंगणी (बु.) येथील शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना काल शनिवारी (दि ०४) सकाळी उघडकीस आली. लहू उर्फ कुणाल रघुनाथ उजगरे ( २४वर्ष) असे शेतकऱ्याचे नाव आहे. सततच्या नापिकेला कंटाळत कर्जबाजारी झाल्याने हिंगणी बु. शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. काही वर्षांपासून पिकाची नासाडी व पिकांना बाजारभाव कमी येत असल्याने सदर शेतकरी शेजाऱ्यांना व मित्रांना बोलून दाखवत असे.
अनेक दिवसांपासून तो याच विवंचनेत होता. पैसा नसल्यामुळे मला आत्महत्या करावीशी वाटते असेही तो म्हणत असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी धारूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी उशिरा हिंगणी गावात मयत लहू उजगरे वर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.