आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करात्रासाला कंटाळून जालना आणि नांदेड जिल्ह्यात दोघी जणींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. जालना जिल्ह्यातील मानेगाववाडी येथे काॅल रेकाॅर्डिंग, व्हाॅट्सअॅप चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी व त्रास दिल्याने अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मनीषा विजय पवार (१५) असे मृत मुलीचे नाव आहे.
तुकाराम दासू पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मनीषा ही रामनगर येथील एका शाळेत शिकण्यास होती. दरम्यान, तपास परतूर विभागाचे पिंक मोबाइलचे पथक करीत आहे. दुसरी घटना नांदेड शहरात घडली. लग्न करण्यासाठी मित्राच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३० नोव्हेंबरच्या सायंकाळच्या सुमारास शांतीधाम गोवर्धनघाट परिसरात घडली. वजिराबाद भागातील शांतीधाम गोवर्धनघाट येथील अश्विनी अरविंद जोंधळे (१८) व किरण रावजी नांगरे (२३ रा. शांतीधाम गोवर्धन घाट) हे दोन तीन वर्षांपासून मोबाइलच्या माध्यमातून संपर्कात होते. त्यानंतर किरण नांगरे हा अश्विनी जोंधळे हिला लग्नाची मागणी करत होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.