आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:प्रॅक्टिकलकडून थेअरीकडे गेलो‎ तरच आजचे शिक्षण रोजगारक्षम‎

जालना‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आजची शिक्षण पद्धती ही थेरी कडून‎ प्रॅक्टिकल जाते, हेच गणित चुकीचे‎ आहे, प्रत्यक्षात प्रॅक्टिकल कडून‎ थेरीकडे गेलो तरच आजचे शिक्षण हे‎ रोजगारक्षम असेल. त्यामुळे वाढत्या‎ तरुणांच्या संख्येमध्ये शिक्षणाने‎ कौशल्य निर्माण केले पाहिजे असे‎ प्रतिपादन डॉ. संजय मून यांनी केले.‎ डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व‎ अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना‎ यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित दोन‎ दिवशीय विद्यार्थी समुपदेशन, व्यवसाय‎ मार्गदर्शन व प्लेसमेंट कार्यशाळेच्या‎ उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक‎ म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी‎ प्राचार्य डॉ. मिलींद पंडित होते.‎ संयोजक प्रोफेसर डॉ. दादासाहेब‎ गजहंस यांनी कार्यशाळेच्या आयोजना‎ संदर्भातील भूमिका मांडली.‎ डॉ. मून म्हणाले, आजची परीक्षा‎ पद्धती ही सेमिस्टर पद्धती असून‎ शिक्षक हा कारकुनी होत चाललेला‎ आहे. शिक्षण प्रक्रियेमध्ये आपण‎ सर्वांनी सहभागी होणे अपेक्षित आहे.‎

शिक्षण प्रक्रियेत आपण का सहभागी‎ झालो? याचा विचार आपण स्वतः‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करावा. बालपणी शिक्षण कसे होते,‎ आम्ही स्वतः शाळेत गेलो नाही, स्व:‎ इच्छेने सहभागी झालो नाही. आजची‎ पिढी मात्र भिन्न आहे. आई-वडिलांची‎ स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शिक्षणाकडे‎ आलेली आहे. त्यामुळे आजच्या‎ वाढत्या तरुणांच्या संख्येमध्ये‎ रोजगारक्षम शिक्षण असणे गरजेचे‎ आहे. आजचे शिक्षण जर रोजगारक्षम‎ झाले नाही तर भविष्यामध्ये विद्यार्थी हा‎ ग्राहक तक्रार निवारण केन्द्राकडे तक्रार‎ करेल अशी परिस्थिती पाच सात वर्षात‎ येऊ शकते.

जागतिक स्तरावर‎ लोकसंख्येची समस्या, विकसित‎ राष्ट्रांमध्ये वृध्दांची असणारी संख्या‎ आणि भारतामध्ये असणारी तरुणांची‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संख्या याचा विचार करता भारत हा‎ महासत्ता होण्यासाठी आपल्याला‎ आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये रोजगार‎ निर्माण करण्याची क्षमता निर्माण करणे‎ गरजेचे आहे. अध्यक्षीय समारोपात‎ प्राचार्य डॉ. पंडीत यांनी तरूणांनी‎ आशावादी राहून आपल्या प्रगतीसाठी‎ संधीचा शोध घेतला पाहिजे. असे‎ सांगितले. प्रारंभी अल्मास शेख हिने‎ स्वागत गीत सादर केले.

बातम्या आणखी आहेत...