आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंत:विकासाचे मनोरे शेतकऱ्यांच्या थडग्यावर नको‎

परतूर‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विकास जरूर करा, तो आवश्यक‎ आहे मात्र विकासाचे मनोरे‎ शेतकऱ्यांच्या थडग्यावर उभारू‎ नका. विकासाच्या नावाखाली‎ शेतकऱ्याच्या जमिनी घेण्याचे काम‎ सुरू आहे मात्र त्यांना योग्य मोबदला‎ सरकारकडून दिला जात नाही.‎ सरकार आले व गेले, सरकार मधली‎ माणसे बदलली मात्र सरकारची‎ व्यवस्था आहे तशीच आहे, अशी‎ खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे‎ अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यांनी व्यक्त केली.‎

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या‎ वतीने परतूर शहरातील मोंढा भागात‎ आयोजित शेतकरी परिषदेत ते बोलत‎ होते. यावेळी डॉ. प्रकाश पोकळे,‎ शिवाजी महाराज भोसले, सुरेश‎ गवळी आदींची प्रमुख उपस्थिती‎ होती. यावेळी शेट्टी म्हणाले,‎ पंतप्रधान पीक विमा योजनेतून‎ वर्षाकाठी जनतेच्या पैशावर डल्ला‎ मारण्याचे काम विमा कंपन्या आणि‎ सरकार मधील काही लोक करत‎ आहेत. जनतेच्या पैशावर‎ शेतकऱ्यांच्या नावाखाली संघटितपणे‎ दरोडा घालण्याचे काम या‎ माध्यमातून केले जात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...