आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:फुलांपासून रंग बनवण्याचे महिलांना प्रशिक्षण‎

जालना‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धूलिवंदनात चुकीचा रंग निवडला तर‎ शरीराला इजा होते. यामुळे नैसर्गिक रंगाला‎ प्रत्येक जण महत्त्व देतो. दरम्यान,‎ जालन्यातील कृषी विज्ञान केंद्राकडून २०१५‎ पासून नैसर्गीक रंग तयार करण्याचे बचत‎ गटातील १७० महिलांना प्रशिक्षण दिले आहे.‎ यामुळे पळसाची फुले, हळद, बिट रुट,‎ पालक, कडुलिंबाचा पाला यापासून तयार‎ केलेला नैसर्गिक रंग जालन्यातून इतर‎ जिल्ह्यांतही विक्रीसाठी जात आहे. चालू‎ वर्षात २०० किलोपर्यंत रंग परजिल्ह्यात‎ विक्रीसाठी गेल्याची माहिती केव्हीकेकडून‎ देण्यात आली आहे.‎ होळी साजरी करा, पण आरोग्यही‎ सांभाळा असे आवाहनच आरोग्य‎ विभागाकडून केले जाते. परंतु, यासाठी‎ नैसर्गिक रंगाचीही गरज असते.

दरम्यान,‎ जालना शहरातील खरपुडी येथील कृषी‎ विज्ञान केंद्रांतून रंग तयार करण्याचे प्रशिक्षण‎ मिळाल्यामुळे अनेक महिला होळीच्या‎ अगोदर दहा-बारा दिवसांपासूनच रंग तयार‎ करण्याचे काम सुरू करतात. दरम्यान,‎ पळसाची फुले, बिट रुट, कडुलिंबाचा पाला‎ यापासून रंग तयार करून तो विक्री केला‎ जात आहे. चालू वर्षात २०० किलोपर्यंत‎ रंगाची विविध बचत गटाच्या महिलांनी‎ विक्री केल्याची माहिती केव्हीकेकडून‎ देण्यात आली. यासाठी केव्हीकेचे यशवंत‎ सोनुने, गृह विज्ञान तज्ज्ञ संगीता कऱ्हाळे‎ आदी परिश्रम घेत आहेत. नैसर्गिक रंगामुळे‎ आरोग्यावर परिणाम नसल्यामुळे लहान‎ मुलांसाठीही याच रंगाचा वापर होतो.‎

बचत गटातील महिलांना रोजगार‎
बचत गटातील महिलांना रोजगार मिळाला.‎ होलसेल पद्धतीने इतर जिल्ह्यांतही हा रंग‎ पाठवला जातो. लाल, पिवळा, हिरवा, निळा‎ असे रंग तयार करून पाठवण्यात आले आहेत.‎ ५०० ते ६०० रुपयांच्या किलोपर्यंत हा दर जातो.‎

२०१५ पासून महिलांना प्रशिक्षण‎
२०१५ पासून महिलांना नैसर्गिक रंग तयार‎ करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यातून काही बचत‎ गटांनी हा उद्योगही सुरू केला आहे. यातून या‎ बचत गटांच्या काही महिलांना रोजगार मिळाला.‎ - संगीता कऱ्हाळे, गृहविज्ञान तज्ज्ञ, केव्हीके, जालना

बातम्या आणखी आहेत...