आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 मार्चपर्यंत अर्ज‎ मंजुरीचे आवाहन‎:शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जातीच्या अडीच हजार विद्यार्थ्यांची नोंद नाही‎

जालना‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील‎ प्रवेशित व भारत सरकार‎ शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र‎ अनुसूचित जाती, विजा, भज,‎ इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील‎ विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रणालीवर‎ अर्ज नोंदणी करिता जालना‎ जिल्ह्यातील महाविद्यालयांचे २४‎ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या‎ कालावधीत तालुकानिहाय‎ महाविद्यालयांचे कॅम्प घेण्यात‎ आले. मात्र ८ मार्च २०२३ पर्यंत‎ अनुसूचित जाती प्रवर्गातील‎ विद्यार्थ्यांचे फक्त ८ हजार ८२ अर्ज‎ नोंदणी झाले असून गतवर्षापेक्षा २‎ हजार ५३६ अर्ज कमी आहे.‎ त्यामुळे येत्या १५ मार्चपर्यंत‎ महाविद्यालय स्तरावर प्रलंबित‎ अर्जाची पडताळणी करुन पात्र‎ अर्ज मंजूर करण्याचे आवाहन‎ समाज कल्याणचे सहायक‎ आयुक्त अमित घवले यांनी केले‎ आहे.‎

प्रवेशित विद्यार्थ्यांची तात्काळ‎ अर्ज नोंदणी व अर्ज मंजुर करणे,‎ शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांकडून‎ शिक्षण शुल्क वसूल न करणे,‎ महाविद्यालयांत समान संधी केंद्र‎ स्थापन करण्याबाबत जालना‎ समाज कल्याणचे सहायक‎ आयुक्त अमित घवले यांनी‎ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना‎ सुचना दिलेल्या आहेत. मात्र,‎ नोंदणी केलेल्या अर्जापैकी १ हजार‎ ४२१ अर्ज महाविद्यालयीन स्तरावर‎ अद्यापही प्रलंबित असून‎ महाविद्यालयांकडे सातत्याने‎ पत्रव्यवहार, कॅम्प घेऊनही अर्ज‎ मंजुरीबाबत कार्यवाही होत नाही.‎

जिल्ह्यातील महाविद्यालयांनी‎ प्रवेशित विद्यार्थ्यांची तात्काळ‎ महाडिबीटी प्रणालीवर अर्ज नोंदणी‎ करण्यासाठी समान संधी केंद्रामध्ये‎ नियुक्त केलेल्या समन्वयक यांची‎ मदत घेऊन अर्ज नोंदणी‎ वाढण्याची दक्षता घ्यावी. ज्या‎ विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज नोंदणी‎ केलेली नाही, त्यांनी तात्काळ अर्ज‎ भरावा. अर्ज नोंदणीकरिता शासन‎ स्तरावरुन मुदत वाढविली‎ नसल्यास अर्ज सादर करता येणार‎ नाही, त्यास सर्वस्वी विद्यार्थी व‎ महाविद्यालय जबाबदार असतील‎ याची गांभिर्याने नोंद घ्यावी, असेही‎ घवले यांनी म्हटले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...