आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे यांचे प्रतिपादन:निपुण भारत अभियानांतर्गत शिक्षक, माता‎ पालक गटाची भूमिका महत्त्वाची ठरते‎

अंबड‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान‎ अभियानांतर्गत विद्यार्थी शिक्षक व माता‎ पालक गटाची भूमिकेबरोबरच शिक्षक व‎ मुख्याध्यापकाची भूमिका अत्यंत‎ महत्त्वाची व निणर्यांक व अभिमानास्पद‎ असल्याचे केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे यांनी‎ सांगितले.‎ निपुण भारत अंतर्गत असर व नास या‎ राष्ट्रस्तरीय विद्यार्थी अध्ययनस्तर‎ संपादणूक पातळीचे जिल्हा विश्लेषण‎ याबाबत नुकतीच केंद्रस्तरीय शिक्षण‎ परिषद प्राथमि शाळा किनगाववाडी येथे‎ झाली. यावेळी ते बोलत होते.‎ अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन‎ समितीचे अध्यक्ष राधेश्याम मुराहाडे होते.‎ रोहिलागड केंद्रांतर्गत जिल्हा परिषद‎ प्राथमिक शाळेमध्ये यशस्वी झाल्याने व‎ अध्ययनस्तर गुणवत्ता संपादणुक पातळी‎ वाढविण्यासाठी विविध उपक्रम‎ राबविण्यात येत असल्याने माता पालक‎ गटातील लीडर माता पालक सर्वश्रेष्ठ‎ ठरल्याने यामध्ये कार्य केलेल्या सर्व‎ शिक्षकांची मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांची‎ भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

त्यामुळे‎ सातत्यपूर्ण सर्वंकष सर्वांंगिण विद्यार्थी‎ घडवण्यासाठी शिक्षकांची महत्त्वाची‎ भूमिका बजावत असल्याचे गंगावणे यांनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सांगितले. कौचलवाडी येथील‎ उपक्रमशील शिक्षक राधेश्याम चव्हाण‎ यांनी तालुकास्तरीय प्रशिक्षणामधील भाषा‎ विषयच्या प्राप्त पेटीचा दैनंदिन विद्यार्थी‎ गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक अध्ययन‎ अध्यापनात या शैक्षणिक साहित्य चा वापर‎ कसा करावा याबाबत सविस्तर‎ प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले तर दुसऱ्या‎ सत्रामध्ये गजानन जाधव यांनी गणित‎ विषयाच्या बाबतीत विद्यार्थी गुणवत्ता‎ वाढीसाठी प्राप्त १४६ शैक्षणिक साहित्य‎ कशी वापरायचे त्याचे निगा काळजी कशी‎ ठेवायची याची माहिती दिली.

यावेळी‎ सारिका टकले, वर्षा गोरडे, अर्चना‎ आहिरे, सुप्रिया खेडकर, अंजली माळोदे,‎ शंकर शेट्टये, अनुजा साळुंके, प्रदीप‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बाविस्कर, मीरा गिराम, विठ्ठल गीते यांना‎ उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानित‎ करण्यात आले. रोहिलागड केंद्रातील‎ पहिली तंबाखू मुक्त शाळा केल्याबद्दल‎ जिल्हा परिषद देशगव्हाण शाळेचे‎ मुख्याध्यापक भाऊसाहेब पठाडे यांनाही‎ प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात‎ आले. सूत्रसंचालन गजानन जाधव यांनी‎ तर चंद्रकांत गायकवाड यांनी आभार‎ मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संभाजी‎ शिरसाट, भास्कर तांगडे, प्रदिप जाधव,‎ विजय आग्रे, कृष्णा भवर, वैशाली भिसे,‎ सारिका टाकले आदींनी परिश्रम घेतले.‎ यावेळी केंद्रातील मुख्याध्यापक,‎ शिक्षकांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...