आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तळणी - देवठाणा रस्ता कामाची केली पाहणी‎:रस्ता कामावर माती‎ मिश्रीत वाळूचा वापर‎

तळणी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळणी ते देवठाणा या पाच‎ किलोमीटरचे काम सार्वजनीक‎ बांधकांम विभागाच्चा दुर्लैक्षामुळे‎ निकृष्ट दर्जाचे केले आहे. या‎ बाबत ग्रामस्थांनी तक्रार करुन काम‎ बंद पाडले होते. या कामावर‎ सार्वजिनक बांधकाम विभागाचे‎ उपअभियंता भगवान िशंदे यांनी‎ भेट देऊन कंत्राटदारास योग्य त्या‎ सूचना दिल्या.‎ या कामावरील संबंधीत‎ कंत्राटदाराने काळी माती खोदून‎ सिमेन्टचे बेड करणे गरजेचे‎ असताना खडीवरच सिमेन्ट‎ काँक्रीटचा माती मिश्रीत‎ अंथरण्यात येत असून माती मिश्रीत‎ वाळू व खडीचा वापर करण्यात‎ आला. या रस्ता कामासाठी चार‎ कोटीचा निधी उपलब्ध झालेला‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहे.

परंतु अंदाजपत्र काप्रमाणे‎ काम करण्यात येत नाही. मध्यंतरी‎ सरपंच गौतम शिंदे व इतरांनी या‎ कामाची पाहणी करुन नाराजी‎ व्यक्त केली होती. सदर काम‎ अंदाजपत्र काप्रमाणे करण्याबाबत‎ अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान,‎ दोन दिवसापूर्वी उपअभियंता‎ भगवान शिंदे यांनी सदर कामास‎ भेट देऊन पाहणी केली. प्रोजेक्ट‎ व्यवस्थापकाला माती मिश्रीत वाळू‎ धुवून घेण्याची सूचना केली.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दरम्यान, सद्यस्थितीत वाळू‎ उपलब्ध होत नसल्यामुळे गरीब‎ गरजूंचे घरकुलाचे काम ठप्प आहे‎ मात्र तळणी देवठाणा रस्त्यासाठी‎ लागणारा शंभर ते दिडशे ब्रास‎ वाळूसाठा नेमका आला कोठून,‎ यामुळे सबंधीत कंत्राटदार हे काम‎ उरकण्याचा सपाटा लावत आहे.‎ देवठाणा तळणी या रोडवरून‎ परीसरातील अनेक गावाच्या‎ प्रवाशांची ये जा मोठ्या प्रमाणात‎ असते.

रस्त्याच्या कामामुळे‎ ठिकठिकाणी गिट्टीचे गंज पडले‎ असून ठेकेदाराने वाहतूकी साठी‎ वळण रस्ता काढून देने गरजेचे‎ असतानाही तो काढला‎ नसल्यामुळे एक साईड वाहन‎ चालकाची कसरत होत आहे‎ अनेक दुचाकीस्वाराना कसरत‎ करावी लागत आहे. दरम्यान,‎ तळणी देवठाणा रोडच्या कामाचा‎ दर्जा अत्यत खालच्या दर्जाच्या‎ असून बोगस साहित्याचा वापर व‎ संबंधीत अधिकाऱ्यांची‎ ठेकेदारावरील मेहरबानी मुळे‎ त्याना बळ मिळत संबधीत रोडची‎ चौकशी करण्याची जिल्हाधि‎ ऱ्यांकडे करणार असल्याचे सरपंच‎ गौतम सदावर्त यानी सांगितले.‎ सध्या तळणी परीसरात वाळूची‎ टंचाई असताना सबंधीत‎ कंत्राटदाराकडे एवढ्या मोठया‎ प्रमाणात वाळू साठा येतोच कुठून,‎ असा सवाल उपस्थित केला जात‎ आहे. याचीही चौकशी करण्याची‎ मागणी ग्रामस्थांनी केली आहे.‎