आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीप्रश्न सुटणार:326 गावांसाठी  वॉटरग्रिड' 800 कोटी खर्च, 6 महिन्यांत होणार सुरू‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना, बदनापूर, अंबड आणि भोकरदन या‎ तालुक्यांतील ३२६ गावांसाठी वॉटरग्रिड योजना राबवली‎ जाणार आहे. जायकवाडी प्रकल्प हा योजनेच्या‎ पाण्याचा प्रमुख उद्भव असेल. जवळपास ८०० कोटी‎ रुपये खर्चाच्या या योजनेला मुख्यमंत्री आणि‎ उपमुख्यमंत्र्यांनी तत्त्वतः मंजुरी दिली असून येत्या १५‎ दिवसांत डीपीआर तयार करण्याचे आदेश महाराष्ट्र‎ जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांना देण्यात आले‎ आहेत, अशी माहिती माजी मंत्री अर्जुन खोतकर व‎ आमदार नारायण कुचे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत‎ दिली.‎

पत्रकार परिषदेस भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर‎ दानवे, बाळासाहेबांची शिवसेनेचे संपर्कप्रमुख पंडितराव‎ भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, मोहन अग्रवाल,‎ भास्कर मगरे, बाबासाहेब इंगळे, संतोष मोहिते व महिला‎ आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. माजी मंत्री‎ खोतकर म्हणाले, जल जीवन मिशनअंतर्गत ही योजना‎ राबवण्यात येणार आहे. जालना व बदनापूर विधानसभा‎ मतदारसंघात ३२६ गावांसाठी दीड हजार किलोमीटर‎ लांबीची जलवाहिनी अंथरण्यात येईल. पुढील ३० वर्षांचे‎ नियोजन करून ही वॉटरग्रिड योजना तयार केली जाईल.‎ पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गावाला मुबलक व स्वच्छ पाणी‎ मिळेल. यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव‎ पाटील यांच्या दालनात शुक्रवारी बैठक झाली.‎

५० टक्के केंद्राचा निधी‎ जालना आणि बदनापूर विधानसभा‎ मतदारसंघातील एकूण ३२६ गावांमध्ये ही योजना‎ राबवण्यात येणार आहे. यात जालना‎ तालुक्यातील ११०, बदनापूर ८५, अंबड ७३ आणि‎ भोकरदन तालुक्यातील ५८ गावांमध्ये ही वॉटरग्रिड‎ योजना राबवण्याचे प्रस्तावित असल्याचे माजी‎ मंत्री खोतकर यांनी सांगितले. या योजनेसाठी केंद्र‎ शासनाचा ५० टक्के व राज्य शासनाचा ५० टक्के‎ निधी मिळणार आहे.‎

आणखी गावे वाढणार‎ बदनापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांच्या‎ योजना चार महिन्यांतच कोरड्या पडतात. त्यानंतर गावांना‎ पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे या गावांसाठी‎ वॉटरग्रिड योजना उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे ही योजना‎ राबवण्याची मागणी दोन ते तीन महिन्यांपासून लावून धरली‎ होती. यात आता भोकरदन विधानसभा मतदारसंघातील‎ गावे वाढवण्यासाठी आमदार संतोष दानवे प्रयत्नशील‎ आहेत.‎ -नारायण कुचे, आमदार, बदनापूर विधानसभा‎ या धरणातून पाणी‎ योजनेला जायकवाडी धरणासह‎ राजेवाडी, वाल्हा, सोमठाणा,‎ पळसखेडा दाभाडी व बाणेगाव‎ तलावातून गुरुत्वाकर्षण पद्धतीने‎ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. १२०‎ एमएलडी क्षमतेची ही योजना असून‎ यासाठी सुमारे ८०० कोटींचा खर्च‎ अपेक्षित आहे. हातवण प्रकल्पाची‎ क्षमता ४५ मीटर क्यूबपर्यंत वाढवणार‎ असल्याचे खोतकर यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...