आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ज्ञानाला सद्गुणांची जोड दिली तरच मोठे होऊ‎

जालना‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञान महत्वाचेच व त्याला‎ अनन्यसाधारण महत्त्व आहे पण‎ त्याला सद्गुणांची जोड ही अत्यंत‎ महत्त्वाची आहे. महापुरुषांनी‎ आपल्या प्रगतीसाठी ज्ञानाचे महत्त्व‎ वारंवार आधोरेखितरित केले आहे‎ पण‎ समाज हा ज्ञानाबरोबरच‎ व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या चांगल्या‎ गुणांमुुळे प्रभावित होतो. ज्ञानामुुळे‎ अनेकजण उच्चपदस्थ अधिकारी‎ होतात पण ते जनतेबरोबर चांगले‎ वागतात तेच लोकप्रिय होतात. हा‎ त्यांच्या गुणांचाच प्रभाव असतो.‎ असे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर‎ आंबेकर यांनी सांगितले.‎ जालना शहरातील नागोजीराव‎ सतकर प्राथमिक शाळेत महिला‎ दिनाचे औचित्य साधून शिवसेना‎ उध्दव बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय‎ आघाडीच्यावतीने विद्यार्थ्यांना‎ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या‎ जीवन चरित्र पुरस्काचे मोफत वाटप‎ करण्यात आले.

यावेळी ते बोलत‎ होते. व्यासपीठावर शाळेचे अध्यक्ष‎ बाबुराव सतकर, डॉ. राजेश राऊत,‎ राजकुमार दवंडे, प्रकाश बुधवंत‎ यांची उपस्थिती होती.‎ अंबेकर म्हणाले, प्रचंड ज्ञान‎ असूनही जर त्याचा उपयोग‎ समाजाला होत नसेल तर ते ज्ञान‎ कुचकामी आहे. समाजाजात कसे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वागावे, बोलावे हे कळले पाहिजे.‎ आपल्या ज्ञान उपयोग समाजाला‎ झाला पाहिजे तरच समाज आपला‎ आदर करील. अनेकांना ज्ञानाचा,‎ पदाचा अहंकार असतो अशी माणसं‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ समाजाला नकोशी वाटतात. तर‎ आदर, समर्पण, नम्रता, परिश्रम,‎ जिद्द, चिकाटी असे गुण अंगी‎ असतील तर समाज नक्कीच‎ आपला आदर करील. आमच्या‎ राजकीय क्षेत्रातही एखादी‎ निवडणूक जिंकल्याने नव्हे तर‎ आपल्या कर्तृत्व व सद्गुणामुळेच‎ पुढे त्यांची ओळख राहत असल्याचे‎ सांगितले.

राजमाता जिजाऊंनी‎ छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर‎ ज्ञानाबरोबरच उत्तम गुणांचेही‎ संस्कार केले. त्यामुुळेच एकटे‎ छत्रपती शिवाजी महाराज आजही‎ रयतेचे जाणते राजे म्हणून लोकप्रिय‎ आहेत व महाराजांच्या सद्गुणांचे‎ अनेकप्रसंग आजही ऐकावयास‎ मिळतात. यावेळी माया कांबळे,‎ अॅड. रेखा कांबळे, कविता दाभाडे‎ यांच्यासह मुुख्याध्यापिका ठाकरे‎ यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...