आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:संत साहित्यापासून युवापीढी दूर, गुन्हेगारीत वाढ‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संतानी वाईट कृत्यास पाप म्हटले‎ असून या आज कायद्याच्या भाषेत‎ त्याला आपण गुन्हा म्हणतात.‎ युवापिढी संत साहित्यापासून दूर‎ गेल्यामुळे युवकांमध्ये गुन्हेगारी‎ प्रमाण वाढले आहे. असे प्रतिपादन‎ जेईएस महाविद्यालय जालना च्या‎ राष्ट्रीय ‌सेवा योजनेच्या विशेष श्रम‎ संस्कार शिबीरात वरूड येथे अॅड.‎ दिपक कोल्हे‌ यांनी केले.‎ जेईएस‌ महाविद्यालय जालना च्या‎ राष्ट्रीय ‌सेवा योजना विभागातर्फे‎ //"युवकांचा ध्यास, ग्राम -शहर‎ विकास//" या विषयावर विशेष श्रम‎ संस्कार शिबीराचे ३ ते ९ ‌दरम्यान‎ वरूड ता. जि. जालना येथे‎ आयोजित करण्यात आले आहे.

५‎ रोजी दु. २.३० वा. बौध्दीक सत्रात‎ संत साहित्य व कायदा यावर‎ सरकारी अभियोक्ता अॅड. दिपक‎ कोल्हे यांच्या व्याख्यानाचे आयोजन‎ करण्यात आले होते. यावेळी‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अॅड.‎ देवराव डोंगरे होते तर व्यासपीठावर‎ राष्ट्रीय ‌सेवा योजनेचे कार्यक्रम‎ अधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र सोनवणे व‎ प्रा. करण सातपुते यांची उपस्थिती‎ होती.

यावेळी व्याख्याते म्हणून‎ बोलतांना अॅड. दिपक कोल्हे‎ म्हणाले की, आज युवापिढी वर‎ संस्कार होण्याची गरज असून,‎ युवकांनी संत साहित्याचा अभ्यास‎ करावा त्यामुळे चांगले संस्कार‎ होवून, वाईट कृत्यास आळा बसेल,‎ पर्यायाने गुन्हेगारी कमी होण्यास‎ मदत होईल, संत नामदेव, ज्ञानेश्वर,‎ तुकाराम, एकनाथ मुक्ताबाई,‎ जनाबाई आदी संताची उदारणे देवून‎ जिवनातील त्याग, आदर्शची माहिती‎ सांगितली, युवकांनी ज्ञानवंत व्हावे‎ असे ही अॅड. कोल्हे यांनी सांगितले.‎ अध्यक्षीय समारोप करताना अॅड.‎ देवराव डोंगरे म्हणाले की, युवकांनी‎ आदर्श नागरिक व्हावे,‎ थोरा-मोठ्यांचा आदर करावा.‎ त्यागातून मानवी जीवन समृद्ध व‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सुखी सुंदर होते. असे अॅड. डोंगरे‎ यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन आदित्य गोमटे यांनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ केले तर विजय म्हस्के यांनी केले.‎ यावेळी प्रा. दत्तात्रय भुतेकर ग्रामस्थ‎ व शिबिरार्थी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...