आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामैत्रीचे संबंध असलेल्या प्रियकर महिलेने लग्न करण्यासाठी तगादा लावल्याने त्रासाला कंटाळून युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मंठा तालुक्यातील गोसावी पांगरी येथे मंगळवारी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी प्रेयसीविरुद्ध परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकला तातेराव मानकर (गोसावी पांगरी, ता.मंठा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २३ नोव्हेंबर रोजी मुलगा शरद तातेराव मानकर हा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बाहेरगावी चाललो असे म्हणून घरातून निघून गेला. त्यानंतर थोड्या फोन करून घरी बोलावले. मात्र घरी आला नाही. आत्महत्या केल्याचे नंतर स्पष्ट झाले.
शरदला एका महिलेचा मानसिक त्रास मुलगा शरद मानकर व गावातील एक महिला या दोघांचे मैत्रीचे संबंध होते. ती नेहमी शरद याला आपण पळून जाऊन लग्न करू, तू माझ्याशी लग्न केले नाही तर तुझे लग्न होऊ देणार नाही, असे म्हणून शरद यास नेहमी मानसिक त्रास देत होती. मुलाने घटनेबाबत घरी सांगितले असता महिलेला समजावून सांगितले. परंतु, तिने ऐकले नाही. शरदला लग्न कर म्हणून नेहमी त्रास देत होती. प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून शरद मानकर यांनी गोसावी पांगरी शिवारातील शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली, असे शरदच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.