आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 उंबऱ्यांच्या चारनेरवाडीत 15 एमडी, एमएस डाॅक्टर‎:सिल्लोडजवळील गावच्या तरुणांची उत्तुंग भरारी‎

श्रीराम डफळ | आमठाणा (सिल्लाेड)‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गावात एसटीही जात नाही, पण जिद्दीच्या बळावर वैद्यकीय क्षेत्रात सिल्लोडजवळील गावच्या तरुणांची उत्तुंग भरारी‎

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लाेड‎ तालुक्यातील चारनेरवाडी या अवघ्या ५० उंबऱ्यांच्या‎ गावात १५ जणांनी एमबीबीएस एमडी, एमएस असे‎ उच्च शिक्षण घेऊन नावलाैकिक मिळवला आहे.‎ विशेष म्हणजे डाेंगरदऱ्यात वसलेल्या या छाेट्याशा‎ गावात एसटीसुद्धा जात नाही. पण जिद्दीच्या बळावर‎ येथील विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात गावचे नाव माेठे‎ करत आहेत.‎ चारनेवाडीची लाेकसंख्या अवघी ४०० इतकी‎ आहे. या गावात दळणवळणाची काहीच व्यवस्था‎ नाही. सिल्लाेडपासून ३० किलाेमीटरवर आमठाणा‎ हे बाजारपेठेचे माेठे गाव. तेथून सहा किमी अंतरावर‎ चारनेरवाडी आहे. या गावात प्रामुख्याने राजपूत‎ समाज मोठ्या प्रमाणात आहे. या गावाला‎ परदेशीवाडी या नावानेही संबाेधले जाते. डाॅ. राजू‎ माेहनसिंग गाेठवाल हे गावातील पहिले डाॅक्टर.‎ त्यांनी एमबीबीएस एमडी रेडिऑलिस्टचे शिक्षण‎ घेतले. त्यांच्याप्रमाणेच कल्याणसिंग नथूसिंग राजपूत‎ यांनीही एमबीबीएस एमएसचे शिक्षण पूर्ण करून ते‎ कॅन्सरतज्ज्ञ झाले. त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध सेठ जी.‎ एस. मेडिकल कॉलेज व केईएम रुग्णालयात व‎ त्यानंतर गुजरातमधील अहमदाबाद येथील प्रख्यात‎ एचसीजी कॅन्सर सेंटर येथे डीएनबी इन सर्जिकल‎ ऑन्कॉलॉजीचे शिक्षण घेतले. सध्या ते छत्रपती‎ संभाजीनगरमध्ये कमलनयन बजाज रुग्णालयात‎ सेवा देत आहेत.‎

शिक्षण छत्रपती संभाजीनगरात झाले‎ माझे दहावीपर्यंत शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील‎ सरस्वती भुवन विद्यालयात झाले. त्यानंतर बारावीचे शिक्षण‎ ‎ घेऊन शासकीय वैद्यकीय‎ ‎ महाविद्यालयातून १९९१ मध्ये एमबीबीएसचे‎ ‎ शिक्षण घेतले. एमडी रेडिऑलाॅजी‎ ‎ झाल्यानंतर जालना जिल्ह्यात मेडिकल‎ ‎ ऑफिसर म्हणून सेवा दिली. सध्या पनवेल‎ ‎ येथे खासगी स्वत:चे रुग्णालय चालवताे.‎ पत्नी संध्या गाेठवालही डाॅक्टर आहे.‎ - डाॅ. राजू माेहनसिंग गाेठवाल, एमबीबीएस, एमडी.‎

आजाराला घाबरून न जाता हिमतीने प्रसंगाला सामोरे जाण्याचा दिला सल्ला‎ सन्मान पाहून डॉक्टर व्हायचे ठरवले‎ गावात येणाऱ्या डॉक्टरांचा आदर-सन्मान पाहून डॉक्टर‎ ‎ व्हायचे ठरवले. माझे मामा कॅन्सरच्या‎ ‎ आजाराने मृत्युमुखी पडले. तेव्हाच‎ ‎ ठरवले की कॅन्सर स्पेशालिस्ट होऊन‎ ‎ कॅन्सर झालेल्यांची सेवा करायची.‎ ‎ माझे स्वप्न पूर्णही झाले. कॅन्सर‎ ‎ झालेल्यांनी कदापि घाबरण्याची गरज‎ नाही. खचून न जाता हिमतीने पुढे जायला हवे.‎ - डॉ. कल्याण राजपूत, एमबीबीएस, एमएस,‎ कॅन्सरतज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर.‎

बातम्या आणखी आहेत...