आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील ७० कर्मचारी संघटनांचे ३० हजार सरकारी कर्मचारी या संपात सामील झाले आहेत. त्यामुळे एेन मार्चअखेरच्या टप्प्यावर कोषागार कार्यालयातून बिले काढण्याची दररोजची १५० कोटींची प्रक्रिया ठप्प झाली आहे. कोषागार कार्यालयात दररोज सहाशे बिले सादरीकरणासाठी येतात, मात्र संपाच्या पहिल्या दिवशी फक्त १४१ बिले दाखल झाली. संप असाच सुरू राहिला तर येत्या पंधरा दिवसांत दोन हजार कोटींपेक्षा अधिक बिलांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. कोषागार विभागात दरवर्षी १२ हजार कोटींची बिले निघतात. त्यातील ३० टक्के बिले मार्च महिन्यात निघतात. त्यात ४० हजार कर्मचाऱ्यांची वेतन आणि निवृत्तिवेतनाची २४० कोटी रुपयांची बिले आहेत. सध्या पंधरा तारखेपर्यंत ५८० कोटीची बिले निघाली आहेत. संप लांबला तर अडीच हजार कोटींच्या बिलांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
७० कर्मचारी संघटना, ३० हजार कर्मचारी सहभागी राज्य सरकारी कर्मचारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना, तलाठी संघटना, भूमी अभिलेख, कोषागार, जिल्हा परिषद कर्मचारी, जीएसटी कार्यालय, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभाग, परिचारिका संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संघटनेचे देविदास जरारे, तलाठी संघाचे राज्य अध्यक्ष अनिल सूर्यवंशी, महसूल कर्मचारी संघटनेचे परेश खोसरे आणि शासकीय परिचारिका संघटनेच्या राज्य अध्यक्ष इंदुमती थोरात यांनी नेतृत्व केले. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे १६ हजार तर शिक्षक आणि शिक्षकेतर १४ हजार कर्मचारी संपात सहभागी झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.