आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील ४ हजार १२२ तलाठी आणि तलाठी संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. त्यास राज्य मंत्रिमंडळानेही मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील ६ विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय माहिती मागवली आहे. त्यामुळे पुढील वर्षी तलाठ्यांची मेगाभरती होणार आहे. तलाठ्यांची औरंगाबाद विभागात एकूण ८४७ पदे रिक्त आहेत.
शासनाने लिपिक व टंकलेखक पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय घेऊन त्याबाबत एमपीएससीला माहिती सादर करण्यासाठी आदेश केले हाेते. शासनाने १४ विभागांतील रिक्त पदांची माहिती घेऊन त्यातील रिक्त पदे एमपीएससीमार्फत भरणार आहेत. त्यासाठी जानेवारीत जाहिरात निघेल. रिक्त पदांबाबतची व बिंदुनामावलीची माहिती शासनाला पाठवण्यासाठी विभागीय आयुक्तालयातील महसूल उपायुक्तांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सर्वच जिल्ह्यांची माहिती दूतावासाद्वारे शासनास पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
नव्याने तलाठ्याची ३११० पदे राज्यात तलाठ्यांची १०१२ रिक्त पदे व नव्याने निर्माण केलेली ३११० पदे अशी एकूण ४१२२ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली. राज्यातील महसुली विभागनिहाय तलाठी (गट-क) पदांचा जिल्हानिहाय तपशील पंधरा दविसांत म्हणजे १५ डिसेंबरपूर्वी पाठवण्याचे आदेश राज्य शासनाने विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
आरक्षणनिहाय माहिती तलाठी पदभरतीसाठी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली प्रमाणित करून सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षणनिहाय, जिल्हानिहाय तपशिलाची मागणी मंत्रालय स्तरावरून तातडीने करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रशासनाची लगबग सुरू आहे
१५ दविसांत रिक्त पदांची माहिती देणे बंधनकारक सर्वच माहिती विहित नमुन्यात वविरण पत्रात भरून जिल्हानिहाय प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त करून १५ दविसांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना वेळेत माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.