आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील ५१ अर्थतज्ज्ञांनी वृद्धावस्थेतील निवृत्तिवेतनात वाढ करणे आणि मातृत्व लाभाला तीन पटींनी वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने नुकत्याच घेतलेल्या आढाव्यातही निवृत्तिवेतनाचा फेरआढावा घेऊन तो सन्मानजनक पातळीपर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती. दुसरीकडे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने एका बाळामागील ६००० रुपयांचा मातृत्व भत्ता तीन पटींनी वाढवावा, असे विचार व्यक्त केले होते. आता देशातील ५१ अर्थतज्ज्ञांनीही अशीच मागणी केली आहे. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहिण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.