आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा:आयटीआयच्या वसतिगृहाचा 89 लाख रुपयांचा निधी गेला परत‎

छत्रपती संभाजीनगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेस्टेशनजवळील मुलांच्या‎ शासकीय आयटीआय वसतिगृहाचा‎ ८९ लाख रुपयांचा निधी खर्च न‎ झाल्याने परत गेला आहे.‎ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा‎ निधी परत गेला असताना कारण मात्र‎ तांत्रिक अडचणींचे पुढे केले जात‎ आहे. यामुळे गेल्या दहा -पंधरा‎ वर्षांपासून सुविधांच्या प्रतीक्षेत‎ असलेल्या विद्यार्थी वसतिगृहाला‎ आता पुन्हा निधीसाठी वाट पाहावी‎ लागणार आहे.‎ ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर‎ येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या वसतिगृहाचा‎ मोठा आधार आहे. आर्थिकदृष्ट्या‎ वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांना यात‎ प्रवेश दिला जातो.

हजार रुपये डिपॉझिट‎ आणि दोन वर्षांचे बाराशे रुपये शुल्क‎ एवढ्या नाममात्र शुल्कावर या ठिकाणी‎ विद्यार्थ्यांची राहाण्याची सोय होते.‎ गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या‎ वसतिगृहाची अत्यंत दुरवस्था झाली‎ आहे. येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे‎ सुधारणा कराव्यात, अशी वारंवार‎ मागणी ते करत आहेत.‎ या वसतिगृहासाठी विद्यार्थ्यांना‎ शुल्क भरावे लागते. मागील दोन वर्षे‎ कोरोनात गेली. त्यापूर्वीच्या दहा-बारा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वर्षांत सुविधांचा अभाव आणि‎ वसतिगृहाची झालेली दुरवस्था, सुरक्षेचे‎ प्रश्न यामुळे वसतिगृहात विद्यार्थी राहत‎ नसत. वसतिगृहात सुधारणा कराव्यात,‎ अशी मागणी वारंवार करण्यात आली‎ होती.‎

निधी खर्च न होता गेला परत‎ या आयटीआय वसतिगृहाच्या‎ दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक‎ नियोजनातून ८९ लाख रुपये मंजूर‎ करण्यात आले होते. मात्र ई-टेंडरिंग‎ प्रक्रियेत तांत्रिक अडचण निर्माण‎ झाल्याने तो निधी खर्च न होता परत‎ गेला आहे. आता हा निधी पुन्हा‎ मिळवण्यासाठी नव्याने प्रस्ताव दाखल‎ करावा लागणार आहे. जिल्हा वार्षिक‎ नियोजनातून जो निधी दिला जातो, तो‎ त्वरित मिळतो. परंतु देखभालीच्या‎ खर्चासाठी तरतूद नाही. त्यामुळे‎ लेखाशीर्षासाठी स्वतंत्र अनुदान‎ असायला हवे, अशी मागणी‎ शासनस्तरावर करण्यात आली आहे.‎

निधीसाठी मागणी करणार‎ आयटीआयला ८९ लाखांचा निधी‎ मंजूर झाला होता. परंतु खर्च न‎ झाल्याने आणि तांत्रिक अडचणी‎ ई-टेंडरिंग प्रक्रियेत आल्यामुळे निधी‎ परत गेला आहे. तो परत मिळावा‎ यासाठी मागणी केली जाणार आहे.‎ दरम्यान, गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना‎ वसतिगृहात सुविधा मिळावी यासाठी‎ ५० लाख रुपये खर्च करून फर्निचर‎ करण्यात आलेे आहे. तसेच‎ आयटीआयमधील सेवानिवृत्त‎ कर्मचारी संस्थेतूनही विद्यार्थ्यांना‎ मदत केली जाते.‎ - एस.पी.नागरे उपप्राचार्य‎ आयटीआय‎