आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजायकवाडी धरणाचे आज संध्याकाळी 18 दरवाजे अर्ध्या फूटाने उघडण्यात आले. यामध्ये 9432 क्युसेक पाण्याने विसर्ग करण्यात आला. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत हे दरवाजे उघडण्यात आले.
जायकवाडीत जलसाठा 90 टक्के
नांदुरमधेश्वर प्रकल्पातून सकाळी अकरा नंतर 30 हजार क्युसेक इतका विसर्ग होत होता. त्यामुळे जायकवाडी प्रकल्पात सोमवारी संध्याकाळी चार वाजता जलसाठा 90 टक्के झाला आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असून, त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नदी, नाल्यांद्वारे, जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. धरणाचे (R.O.S) परिचलन सूचीनुसार आवश्यक असणारी पाणी पातळीचे नियमन करायचे असल्याने संध्याकाळी सहा वाजता जायकवाडीतून पाणी सोडण्यात आले.
नागरिकांना दक्षतेचा इशारा
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत सव्वा सहा वाजता जायकवाडीचे 18 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात येणार आहे. यामध्ये गेटमधून/सांडव्याद्वारे गोदावरी नदीमध्ये 9432 क्युसेकने पुरपाणी सोडण्यास सुरुवात करण्यात येत आहे. तसेच आवक बघून विसर्ग व कमी अथवा जास्त करण्यात येईल. त्यामुळे गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील लोकांना सतर्क राहण्याबाबत तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये अशा सूचना कडाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. तसेच नदी पात्रात पाळीव प्राणी, गुरे-ढोरे, विद्युत मोटारी तसेच इतर तत्सम साहित्य इत्यादी तात्काळ काढून घेण्याबाबत, तसेच कुठलीही जीवितहानी होणार नाही, याबाबत उक्त गावांना तात्काळ सावधानतेचा इशारा देणे संबंधीत यंत्रणेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.