आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिवलग मित्रांसोबत फिरायला गेलेल्या २२ वर्षीय गौतम कचरू जाधव याचा तलावात बूडून मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी सुधाकरनगरजवळील वाल्मीच्या तलावात ही घटना घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेत गौतमला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. गौतम गारखेड्यातील शंभूनगरमध्ये राहत होता. बुधवारी गौतम व त्याच्या मित्रांनी सातारा परिसरात फिरण्याचे ठरवले. सुधाकर कॉलनीच्या मागील बाजूस असलेल्या वाल्मीच्या तलावात गौतम व त्याचे दोन मित्र पोहण्यासाठी उतरले.
मात्र, गौतमला पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार अन्य दोन मित्रांच्या लक्षात आला. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, निर्मनुष्य परिसर असल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. सातारा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी अग्निशामक दलाला कळवले. मुख्य अग्निशामक अधिकारी आर. के. सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक अधिकारी मोहन मुंगसे, एल.पी. कोल्हे, छगन सलामबाद, इसाक शेख, दिनेश मुंगसे, प्रसाद शिंदे, अजय कोल्हे यांनी तलावात शोध घेऊन सायंकाळी गौतमचा मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.