आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे गायरान जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या १६ घरांवर शनिवारी बुलडोझर फिरवण्यात आला. जवळपास ५० वर्षांपासून ही घरे बांधण्यात आली होती, शिवाय येथे नागरिक राहतही होते. टेंभुर्णी येथील गायरान व गावठाणामध्ये ८३० ग्रामस्थांनी अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शनिवारी महसूल विभागाने कारवाई केली. दरम्यान, निवासी घरे नियमानुकूल करण्यासाठी ८३० पैकी ७४६ ग्रामस्थांनी न्यायालयात धाव घेतल्याने या घरांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली. दरम्यान, ज्या ग्रामस्थांनी न्यायालयात दाद मागितली नव्हती, त्या १६ जणांची घरे पाडण्यात आली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अतुल सोरमारे, तहसीलदार स्वरूप कंकाल, पोलिस
उपविभागीय अधिकारी इंदलसिंग बहुरे, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, ग्रामविकास अधिकारी जगदीश आढाव, तलाठी राम धनेश यांच्यासह प्रशासनाचा मोठा ताफा कारवाईसाठी सकाळीच दाखल झाला होता. ही अतिक्रमणे पाडण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी शासकीय जागा म्हणून फलक लावण्यात आले. दरम्यान, महसुलांतर्गत येणाऱ्या ८४ निवासी घरांपैकी ६८ ग्रामस्थांनी स्टे मिळाला असल्याने त्यावर शनिवारी कारवाई करण्यात आली नाही.
टेंभुर्णीतील घरांवर बुलडोझर फिरवण्यात आला. छाया : चैतन्य राऊत नियमानुकूल करण्यासाठी अनेक जण कोर्टात टेंभुर्णी येथील गट क्रमांक एकसह विविध भागांमध्ये वाढीव गावठाणअंतर्गत ५१७ ग्रामस्थ मागील ५० ते ६० वर्षांपासून निवासी घरे बांधून राहत आहेत. परंतु त्यांना अतिक्रमणधारक म्हणून नोटीस आल्यापासून अनेकांची धाकधूक वाढली होती. दरम्यान, शासकीय नियमानुसार घरे नियमानुकूल करण्यासाठी अनेकांनी न्यायालयात दाद मागितली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.