आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’मध्ये कोबाड गांधींचे मत:अफजल गुरू धर्मांध नव्हे तर शिस्तप्रिय होता, मृत्यूनंतर जन्नतमध्ये प्रेषितांना भेटण्यास उत्सुक होता

औरंगाबाद / महेश जोशी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेखक कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाला महाराष्ट्र सरकारने आधी वाङ्मय पुरस्कार जाहीर केला, नंतर काहींच्या आक्षेपामुळे लगेचच हा पुरस्कार रद्द करण्याचा जीआरही काढला. सरकारच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका होत असून दोन साहित्यिकांनी आपले वाङ‌्मय पुरस्कार परत केले आहेत, तर साहित्याशी संबंधित शासकीय समित्यांवरील पाच पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. हे पुस्तक नक्षलवादाचे समर्थन करत असल्याचा सरकारचा आक्षेप आहे. लेखक गांधी यांनी नेमके या पुस्तकात नेमके काय लिहिले आहे, त्यातील काही मुद्दे सारांश स्वरूपात ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी देत आहोत.

अफजल गुरूविषयी : गांधी लिहितात, ‘मला तिहार तुरुंगात हलवण्यात आले होते. येथे आधीपासून संसद हल्ला प्रकरणातील आरोपी अफजल गुरू होता. तो पाच वेळा नमाज पढायचा. जन्नतवर त्याचा विश्वास होता. तो मृत्यूनंतर मोहंमद, रूमी, इक्बाल आणि तिथल्या सर्व प्रेषितांना भेटण्यास उत्सुक होता.’

खलनायक म्हणून रंगवले

अफजलला खलनायक म्हणून रंगवण्यात आले. संसदेवर हल्ला झाला त्या वेळी त्याच्या प्रवासाची योजना एका गुप्तहेर खात्याच्या अधिकाऱ्याने तयार केली होती. त्याने न्यायालयात याचा उल्लेख केला होता. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अफजलची फाशी ही अत्यंत स्वातंत्र्यविरोधी कृती होती, असे कोबाड यांचे मत आहे.

शिवसेनेमुळे वरळीमध्ये दंगल झाल्याचा उल्लेख

कोबाड लिहितात, १९७२ मध्ये दलित पँथर चळवळीने जोर पकडला होता. नामदेव ढसाळ वक्ते असणाऱ्या कार्यक्रमात हिंसा उसळली. येथे पोलिसांच्या मुलांनी खाकी कपडे घालून शिवसैनिकांबरोबर दलितांवर हल्ले केले. या वादातून वरळीत दंगल घडली.

दलितांमुळे खैरलांजी केस कमकुवत

खैरलांजी प्रकरणात ४६ जणांवर गुन्हा असताना ११ लोकांनाच शिक्षा झाली. बहुतांशी दलित असणारे पोलिस, डाॅक्टर आणि सरकारी अधिकाऱ्यांनी हा खटला कमकुवत करण्यासाठी मदत केली. एवढी घटना होऊनही शेजारच्या नक्षलवाद्यांची उपस्थिती असलेल्या गोंदियात काही परिणाम झाला नाही.

प्रत्येक तुरुंगामध्ये व्हायची सरबराई

कोबाड यांना २०१६ मध्ये तिहार तुरुंगातून हैदराबादच्या चेरलापल्ली तुरुंगात हलवण्यात आले. येथे नक्षलवादी आरोपीने कँटीनमधून चिकन बिर्याणी खाऊ घातली. विशाखापट्टणमच्या तुरुंगात तथाकथित नक्षलवादी चड्डा भूषणम याने त्यांची जबाबदारी उचलली. सुरतच्या तुरुंगात तिहारमध्ये भेटलेला डाॅन फजलू रहमानने अहमदाबादच्या तुरुंगातून संपर्क केला आणि तिथे गरजेच्या वस्तू देण्याची व्यवस्था केली. या पुस्तकात झारखंडमधील लढे, तुरुंगात भेटलेले डाॅन किशन पहलवान, बृजेश सिंग, मुन्ना बजरंगी, फजलू रहमान यांच्या कामाचे उदात्तीकरण करण्यात आले.

‘फ्रॅक्चर्ड डिसिजन’:सरकारने एक पुरस्कार मागे घेतला, साहित्यिकांनी 2 परत केले; 5 जणांकडून शासकीय समित्यांचा राजीनामा

बातम्या आणखी आहेत...