आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला शिंदे-फडणवीस सरकार मदत करणारच, असा दावा पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केला. कन्नड तालुक्यातील जेऊर, निपाणी, औराळा तसेच फुलंब्री तालुक्यातील कान्हेगाव व बाबरा या नुकसानग्रस्त गावांलगतच्या पिकांची भुमरे यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय उपस्थित होते. भुमरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तातडीने पंचनामे करून अहवाल तत्काळ शासनास सादर करावा, अशी सूचना त्यांनी केली. जेऊर येथील शेतकरी अशोक पवार, निपाणी येथील दत्तात्रय निकम यांच्या शेतातील कांदा, संजय पवार यांच्या बाजरी पिकाच्या नुकसानीची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. युती शासनाच्या काळातच मराठवाड्यातील जिल्ह्याच्या शहरात स्तंभ उभारले गेले. आगामी विधानसभा उद्धवसेनेसोबत लढताना काही हिंदुत्ववादी मते मिळावीत, असा काँग्रेसच्या नेत्यांचा हेतू दिसतो. कारण आतापर्यंत काँग्रेसने कधीच उत्साहाने मुक्तिसंग्राम दिन साजरा केला नाही. अर्थात राजकारणासाठी का होईना काँग्रेसचे मुक्तिसंग्रामात सक्रिय होणे चांगले आहे. पण काँग्रेसने या निमित्ताने काही ठोस मराठवाड्याला मिळवून द्यावे, अशी नागरिकांची अपेक्षा असल्याचे स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेचे सचिव, राजकीय घडामोडींचे अभ्यासक सारंग टाकळकर यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.