आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटीगाठी सुरूच:तेलंगणामधील बीआरएस आता नव्या‎ नेत्यांच्या आणि तरुण पिढीच्या शोधात‎

छत्रपती संभाजीनगर‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाच माजी आमदारांसह एका माजी खासदारांचा बीआरएसमध्ये प्रवेश‎ माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी‎ मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या‎ उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश केला.‎

तेलंगणामधील भारतीय राष्ट्र समिती‎ (बीआरएस) च्या माध्यमातून राज्यात नव्या‎ पक्षाचा प्रवेश झाला आहे. नांदेडच्या सभेतून‎ मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाची‎ विकासकामे वाचून दाखवत महाराष्ट्रातही जोर‎ लावणार असल्याचे सांगितले होते. राज्यातील‎ माजी आमदार, माजी खासदार बीआरएसमध्ये‎ प्रवेश करत आहेत. मराठवाड्यातील माजी‎ मंत्र्यांनी त्यांची भेट घेतली आहे.‎ आगामी काळात विदर्भातून माजी मंत्री आणि‎ बारामतीतूनदेखील काही नेते बीआरएसमध्ये‎ घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच,‎ काही आमदारदेखील संपर्कात असल्याचा दावा‎ बीआरएसकडून केला जात आहे. आता‎ नवतरुणांना घेण्याच्या सूचनादेखील चंद्रशेखर‎ राव यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.‎ तेलंगणातील ग्रामीण विकासाचे मॉडेल‎ महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न त्यांच्या पक्षाच्या‎ माध्यमातून केला जात आहे. त्यामुळे‎ मराठवाडा, विदर्भातील ग्रामीण नेत्यांना आपलेसे‎ करण्याचे प्रयत्न या पक्षाच्या माध्यमातून केले‎ जात आहेत.‎ महाराष्ट्रात अस्वस्थता,‎ नव्या युवकांना स्थान द्या‎ राज्यात शेती क्षेत्रात अस्वस्थता आहे.‎ त्यामुळे या भागातील नवीन तरुण‎ बीआरएसमध्ये घेण्यासाठी प्रयत्न‎ करा. त्यांना तेलंगणाचा विकास,‎ सिंचनामुळे झालेली प्रगती दाखवून‎ त्याची माहिती त्यांच्यापर्यत‎ पोहोचवण्याच्या सुचना चंद्रशेखर‎ राव यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या‎ आहेत.‎

शेती चळवळीतील लोकांना काम करण्याची संधी‎ ‎ बीआरएसने ग्रामीण भागात विकास कसा करता येऊ शकतो, हे‎ ‎ तेलंगणात दाखवून दिले आहे. त्यामुळे स्वत:च्या घरावर‎ ‎ तुळशीपत्र ठेवून चळवळीत काम करणाऱ्या लोकांसाठी‎ ‎ बीआरएस ही संधी आहे. शेतकरी कामगार चळवळीतील‎ ‎ लोकांनी यामध्ये सहभागी व्हावे हे आमचे आवाहन आहे.‎ ‎ -माणिक कदम, अध्यक्ष, बीआरएस किसान सेल महाराष्ट्र‎

विदर्भातील माजी मंत्री, बारामतीच्या नेत्यांना पक्षात आणणे सुरू‎ माजी आमदारांना दिले‎ जातेय पक्षात स्थान‎ गडचिरोलीचे माजी आमदार दीपक‎ आत्राम, उदगीरचे माजी आमदार‎ मोहन पटवारी, यवतमाळचे माजी‎ आमदार राजू तोडसाम, ठाणे‎ जिल्ह्यातील माजी आमदार दिगंबर‎ भिसे, हिंगणघाटचे माजी आमदार‎ वसंतराव बोंडे आणि माजी खासदार‎ हरिभाऊ राठोड यांनी आतापर्यत पक्षात‎ प्रवेश केला आहे. तसेच, इतर‎ संघटनांच्या माध्यमातून पक्षात प्रवेश‎ केल्याचे पाहायला मिळत आहे. बीड‎ जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळंकेंनी‎ भेट घेऊन खळबळ माजवून दिली‎ आहे. विद्यमान आमदारदेखील‎ आमच्या संपर्कात आहेत. विदर्भ आणि‎ बारामतीमधील नेत्यांचादेखील प्रवेश‎ होणार असल्याचे बीआरएसच्या‎ सूत्रांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...