आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीआरएसची मागणी:तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रात वीज, पाणी मोफत द्या‎; लोकसभा, विधानसभेच्या सर्व जागा लढवणार

छत्रपती संभाजीनगर‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत राष्ट्र समितीच्या दबावापोटीच महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी योजना : हिमांशू त्रिवेदी‎

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार‎ रुपये मदतीची घोषणा केवळ भारत राष्ट्रीय‎ समितीच्या (बीआरएस) दबावापोटीच केली‎ आहे. ‘बीआरएस’ने शेतकऱ्यांसाठी सुरू‎ केलेल्या या योजनेचे स्वागत करते. मात्र, राज्य‎ सरकारने शेतकऱ्याच्या विकासासाठी तेलंगण‎ मॉडेल अवलंबल्यास त्याचा फायदा‎ शेतकऱ्यांना होईल. तेलंगण राज्याच्या धर्तीवर‎ महाराष्ट्रातदेखील शेतकऱ्यांना वीज आणि‎ पाणी मोफत देण्यात यावे, अशी मागणी भारत‎ राष्ट्र समितीचे सरचिटणीस हिमांशू त्रिवेदी‎ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली आहे.‎ बाभळीचा प्रश्न सोडवण्यास तेलंगण सरकार‎ उत्सुक असून राज्य सरकारने प्रतिसाद द्यावा,‎ असे आवाहनही त्रिवेदी यांनी केले.‎ या वेळी भारत राष्ट्रीय समितीच्या छत्रपती‎ संभाजीनगर विभागाचे समन्वयक सोमनाथ‎ थोरात, महाराष्ट्राच्या किसान सेलचे अध्यक्ष‎ माणिक कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित ‎ ‎ होते.‎ सरचिटणीस त्रिवेदी म्हणाले की,‎ तेलंगणामध्ये सरकार शेतकऱ्यांना वीज, पाणी ‎ ‎ मोफत देते. देशात सर्वाधिक शेतकरी‎ आत्महत्या महाराष्ट्रात होतात. आत्महत्या कमी ‎ ‎ करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना पाणी ‎ ‎ आणि वीज मोफत द्यावी. तेलंगण सरकार‎ प्रत्येक शेतकऱ्याला एकरी दहा हजार रुपये ‎ ‎ अनुदान देते. त्याच पद्धतीने महाराष्ट्र ‎ ‎ सरकारनेदेखील शेतकऱ्यांना मदत केल्यास‎ त्यांना फायदा होईल. तेलंगणामध्ये‎ शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबवलेले मॉडेल ‎ ‎ महाराष्ट्र सरकारनेदेखील राबवावे.‎

बाभळी प्रकरणात महाराष्ट्रावर‎ अन्याय होत असल्याबाबत विचारले‎ असता तेलंगण सरकार हा प्रश्न‎ सोडवण्यासाठी तयार आहे. मात्र, या‎ प्रकरणात राज्य सरकारने पुढाकार‎ घ्यावा. चंद्रशेखर राव यांनी‎ तेलंगणाला सर्वत्र पाणी पुरवून‎ सुजलाम सुफलाम केले आहे.‎ त्यामुळे बाभळीचा प्रश्नदेखील‎ सहज सुटेल. त्यासाठी कुठलेही‎ राजकारण करू नये, असे त्यांनी‎ सांगितले.‎

बाभळी प्रकरणात महाराष्ट्रावर‎ अन्याय होत असल्याबाबत विचारले‎ असता तेलंगण सरकार हा प्रश्न‎ सोडवण्यासाठी तयार आहे. मात्र, या‎ प्रकरणात राज्य सरकारने पुढाकार‎ घ्यावा. चंद्रशेखर राव यांनी‎ तेलंगणाला सर्वत्र पाणी पुरवून‎ सुजलाम सुफलाम केले आहे.‎ त्यामुळे बाभळीचा प्रश्नदेखील‎ सहज सुटेल. त्यासाठी कुठलेही‎ राजकारण करू नये, असे त्यांनी‎ सांगितले.‎

निवडणुका लढवणार‎ ‘बीआरएस’ महाराष्ट्र राज्यात‎ लोकसभेच्या व विधानसभेच्या सर्व जागा‎ लढवणार आहे. त्यासाठी संघटन मजबूत‎ करण्यात येत आहे, असेही त्रिवेदी यांनी‎ सांगितले. माणिक कदम म्हणाले की,‎ मराठवाड्यासह महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या‎ मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत.‎ कापसाचा प्रश्नदेखील गंभीर बनला‎ आहे. मात्र राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष‎ करत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या‎ प्रश्नावर लक्ष द्यावे, केवळ राजकारण‎ करू नये.‎

भाजपची सरकारे केवळ कंपनी कॉर्पाेरेटसाठी‎ भाजप सरकार केवळ कंपनी‎ आणि काॅर्पोरेटचे सरकार‎ असल्यासारखे वागत आहे.‎ आयात-निर्यातीच्या यांच्या‎ चुकीच्या धोरणांमुळे‎ शेतकऱ्यांना फटका बसत‎ आहे. त्यामुळे कापसाचा प्रश्न‎ निर्माण झाला आहे. मात्र,‎ देशात आता शेतकरी नेते तयार‎ करण्याचे काम ‘बीआरएस’‎ करणार आहे. देशातील‎ शेतीविषयक धोरणे राबवण्याचे‎ आणि त्या माध्यमातून‎ शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात‎ येणार आहे, असे त्रिवेदी यांनी‎ सांगितले. माणिक कदम‎ म्हणाले की, महाराष्ट्रात‎ शेतकऱ्यांच्या प्रश्नाला कोणी‎ वालीच राहिला नाही. त्यामुळे‎ शेतकरी आत्महत्या केल्या तरी‎ कोणी लक्ष देत नाही.‎ मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या‎ आत्महत्या वाढत असून,‎ त्याकडे राज्य सरकारचे लक्ष‎ नाही. सरकार घोषणा करते‎ मात्र, त्यासाठी तरतुदी करत‎ नाही. महाराष्ट्र सरकारची पीक‎ विमा योजना फसवी असून,‎ त्या माध्यमातून शेतकऱ्यांना‎ काहीही मिळत नाही.‎

बातम्या आणखी आहेत...