आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांना तंबी:शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनाही‎ खासगी शिकवणीसाठी फोन‎, पालकांनी लेखी तक्रार करावी‎

छत्रपती संभाजीनगर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘नमस्कार, तुमची मुलगी, मुलगा दहावी ‎ ‎अथवा बारावीत शिकतोय का? तुमच्या‎ घरात शाळेत जाणारी पंधरा वर्षांपर्यंतची‎ मुले आहेत का?’ असे फोन शैक्षणिक ‎वर्षाच्या सुरुवातीला अनेक पालकांना येत ‎ ‎ आहेत. रोज चार-पाच फोन तरी असेच‎ शाळा अथवा क्लास लावण्यासाठी‎ भंडावून सोडत आहेत. मात्र, सर्व मुलांची‎ अथवा पालकांची वैयक्तिक माहिती‎ मिळते तरी कुठून, असा प्रश्न पालकांना‎ पडला आहे.

विशेष म्हणजे शिक्षण‎ विभागातील अधिकारी आणि‎ शिक्षणाधिकाऱ्यांनाही , ‘तुम्हाला क्लास‎ लावायचा का?’ अशी विचारणा करणारे‎ फोन आले आहेत. या प्रकारामुळे आता‎ शिक्षण विभागही सजग झाला असून‎ एकाही विद्यार्थ्याची आणि त्याच्या‎ पालकांची माहिती, फोन नंबर सार्वजनिक‎ होणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा‎ संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल,‎ ‎अशा कडक शब्दांत शिक्षण विभागाने‎ पत्राद्वारे सर्व शाळांना ताकीद दिली आहे.‎

दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्यावर‎ सध्या विविध प्रकारच्या सीईटी, प्रवेशपूर्व‎ परीक्षांचा हंगाम सुरू आहे. लवकरच‎ प्रवेश प्रक्रियाही सुरू होणार आहे. अशा‎ वेळी महाविद्यालयातून अथवा एखाद्या‎ शाळेतून विद्यार्थ्यांचा डेटा गोळा कसा‎ काय केला जातो, असा प्रश्न आता‎ शिक्षण विभागालाही पडला अाहे. विद्यार्थी‎ अथवा त्यांच्या पालकांची वैयक्तिक‎ माहिती कोणतीही शाळा इतरांना देऊ‎ शकत नाही, असे शिक्षणाधिकारी एम. के.‎ ‎ देेशमुख यांनी सांगितले.

गेल्या काही‎ दिवसांत खुद्द शिक्षण विभागातील‎ अधिकाऱ्यांनाही असाच अनुभव आला‎ असून ‘नमस्कार सर-मॅडम, तुम्ही ...‎ बोलत आहात का? तुम्हाला क्लास‎ लावायचा का? तुमच्या घरात कुणी लहान‎ मुलं आहेत का?’ अशी विचारणा‎ करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची‎ आणि पालकांची वैयक्तिक माहिती बाहेर‎ येते कशी, असा प्रश्न पडला आहे.‎ त्यामुळे कुणालाही माहिती देण्यात येऊ‎ नये अशी तंबी आता शाळांनाच देण्यात‎ आली आहे.‎

विद्यार्थी‎ सुरक्षा महत्त्वाची

क्लास असो वा शाळा, अशा प्रकारचे‎ कोणाचेही फोन आले तर पालकांच्या‎ केवळ तोंडी तक्रारी येतात. असे काही‎ होत असल्यास त्यांनी शिक्षण विभागाकडे‎ लेखी तक्रार करायला हवी. आम्ही‎ शाळांना यापूर्वीही आणि आता पुन्हा‎ विद्यार्थी-पालकांची माहिती गोपनीय‎ ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. विद्यार्थी‎ सुरक्षा महत्त्वाची आहे. असे प्रकार‎ करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई‎ करण्यात येईल.‎

- एम. के. देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी‎ शाळांना तंबी } विद्यार्थी-पालकांची वैयक्तिक माहिती देऊ नका‎