आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागंगापूर तालुक्यातील गळनिंब येथील ३५ वर्षीय युवक सचिन मुळे गंगापूरमध्ये नोकरी करत होते. त्यांनी नोकरी सोडली आणि दुग्ध प्रक्रिया उद्योग सुरू केला. उद्योगातून ते सध्या चौघांना ५० हजार रुपये रोजगाराच्या माध्यमातून पैसे देतात, तर स्वत: एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. अन्न प्रक्रिया उद्योगांतर्गत त्यांना १७ लाख रुपयांचे कर्ज मिळाले होते. दररोज ७०० लिटर दुधावर प्रकिया करून दही, लस्सी, श्रीखंड, मसाला ताक यांचे उत्पादन व विक्री केली जाते. यावर्षी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे छत्रपती संभाजीनगरमधील ५५६ अन्न प्रक्रिया उद्योगाचे प्रस्ताव मंजूर झाले असून देशात सिमला (६१८) पहिल्या आणि छत्रपती संभाजीनगर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अन्न प्रक्रिया उद्योगाचे जाळे निर्माण होत आहे. अन्न प्रक्रियेच्या माध्यमातून शेतकरी उद्योजक होत आहे. जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असून दर तीन महिन्यांनंतर आढावा बैठकदेखील घेतली जाते. या योजनेच्या माध्यमातून उद्योग सुरू करणाऱ्यांना ३५ टक्के सबसिडी मिळते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५५६ प्रस्तावांना मिळाली मंजुरी देशात हिमाचल प्रदेशातील सिमला पहिल्या क्रमांकावर
गंगापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी दूध डेरी प्रोजेक्ट सुरू केला आहे. ग्रामीण भागात अर्थकारणासाठी फायदा अन्न प्रक्रिया प्रकल्पामुळे जिल्ह्यात अर्थकारण सुधारण्यासाठी त्याचा फायदा होत आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २००, तर एसबीआयने ३०८ प्रस्ताव मंजूर केले आहेत. या अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. प्रक्रिया उद्योगामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण झपाट्याने बदलत आहे. - मंगेश केदार, व्यवस्थापक, अग्रणी बँक
मराठवाडा आघाडीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून १,७१२ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी १,३२४ जणांनी प्रकल्पासाठी अर्ज केले होते. मराठवाड्यात बीड १८, जालना जिल्ह्यातील ७७ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. लातूर विभागात हिंगोली ०७, लातूर ९२, नांदेड ६१, धाराशिव ९१, परभणी ३७, असे २८८ प्रस्ताव मंजूर झाले आहेत.
ग्रामीण भागात अर्थकारणासाठी फायदा अन्न प्रक्रिया प्रकल्पामुळे जिल्ह्यात अर्थकारण सुधारण्यासाठी त्याचा फायदा होत आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २००, तर एसबीआयने ३०८ प्रस्ताव मंजूर केले आहेत. या अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. प्रक्रिया उद्योगामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण झपाट्याने बदलत आहे. - मंगेश केदार, व्यवस्थापक, अग्रणी बँक
ग्रामीण भागात अर्थकारणासाठी फायदा अन्न प्रक्रिया प्रकल्पामुळे जिल्ह्यात अर्थकारण सुधारण्यासाठी त्याचा फायदा होत आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २००, तर एसबीआयने ३०८ प्रस्ताव मंजूर केले आहेत. या अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. प्रक्रिया उद्योगामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण झपाट्याने बदलत आहे. - मंगेश केदार, व्यवस्थापक, अग्रणी बँक
प्रक्रिया उद्योग उभारा शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगदेखील उभारावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या वर्षी सुरू केलेले दीडशे प्रक्रिया उद्योग यशस्वी सुरू असून सर्व जण बँकेत व्यवस्थित कर्जफेड करत आहेत. - प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक
शेतकऱ्यांना फायदा मला १७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते. माझ्या गावात पूर्वी शंभर लिटर होणारे दूध संकलन आज ७०० लिटर झाले आहे. शेतकऱ्यांनी असे प्रक्रिया उद्योग सुरू केले तर अर्थकारण सुधारेल. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे. - सचिन मुळे, डेअरी उद्योजक, गंगापूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.