आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या अनेक वर्षांपासून अध्यादेशाचा आधार घेत जिल्हा परिषदेकडून न होणाऱ्या ग्रामसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या ग्रामविकास विभागाने शुक्रवारी काढलेल्या पत्रामुळे आता होणार आहेत. दरम्यान, प्रशासकीय बदल्या होणार असल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.
जिल्हा परिषदेत सध्या बदल्यांचा हंगाम सुरू आहे. सामान्य प्रशासन विभागाने मोठ्या प्रमाणावर विनंती व प्रशासकीय बदल्या केल्या. यामुळे मुख्यालयातील अनेक कर्मचार्यांना हलविण्यात आले आहे. त्यामुळे जि.प.तील सामान्य प्रशासन विभाग मोकळा झाला आहे. दरम्यान, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रशासकीय बदल्या करता येत नसल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे अनेक वर्षांत या दोन्ही विभागाच्या बदल्या झाल्या नव्हत्या. दरम्यान, प्रशासनाने बदल्या करण्याचा आग्रह धरला. तेव्हा कर्मचारी संघटनांनी विरोध करून अध्यादेशाचा आधार घेतला.
दरम्यान, यासंदर्भात ग्रामविकास विभागाचे मार्गदर्शन मागविण्यात आले. 12 मे रोजी जिल्हा परिषदेत पत्र आले. त्यामध्ये बदल्या करण्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे येत्या सोमवारी आरोग्य व मंगळवारी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांनी सांगितले.
बदल्या अन्यायकारक - कर्मचारी
दरम्यान, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या याआधी का केल्या नाहीत. आजच कसे काय पत्र मागवून बदल्या करता? असा सवाल आरोग्यसेविकांनी केला आहे. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. बदल्याचे वेळापत्रक याआधीच ठरलेले असताना त्या तारखाही बदलण्यात आल्या. या बदल्या अन्यायकारक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.