आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळा हिंदुत्ववादी मतांवर:काँग्रेसचे 74 वर्षे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाकडे‎ दुर्लक्ष, आता 75 वे वर्ष साजरे करणार‎

छत्रपती संभाजीनगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुक्तिसंग्रामाचे वर्ष, मात्र कार्यक्रम काहीच नाही‎ भाजपने हैदराबाद मुक्तिसंग्राम सोहळ्याकडे पाठ फिरवल्याचा आरोप‎ मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या मुलांचा सत्कार करणार‎

काँग्रेसच्या नेतृत्वात १७ सप्टेंबर १९४८ रोजी‎ मराठवाडा निजामाच्या जोखडातून स्वतंत्र झाला.‎ ‎ पण १७ सप्टेंबर हा दिवस‎ ‎ मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा‎ ‎ करण्यासाठी काँग्रेसने कधीच‎ ‎ पुढाकार घेतला नाही.‎ ‎ सोहळ्यांचे आयोजन केले‎ ‎ नाही. उलट त्याकडे दुर्लक्षच‎ केले. पण आता मुक्तिसंग्रामाचे अमृतमहोत्सवी‎ वर्ष धूमधडाक्यात साजरे करण्याचे काँग्रेसने‎ ठरवले आहे. त्यात मराठवाड्याच्या प्रत्येक‎ जिल्ह्यातील स्वातंत्र्ययोद्ध्यां च्या मुलांचा सत्कार‎ आणि इतर कार्यक्रम होणार आहेत. या‎ आयोजनासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण‎ यांच्या नेतृत्वात समिती स्थापन होणार आहे. ठाणे‎ येथे नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणी‎ बैठकीत हा निर्णय झाला. भाजपने हैदराबाद‎ मुक्तिसंग्राम सोहळ्याकडे पाठ फिरवली.‎ कार्यक्रमांच्या आयोजनासाठी निधी दिला नाही,‎ असा आरोपही बैठकीत झाला. मात्र, बदलत्या ‎ ‎ राजकारणात उद्धव सेनेसोबत आगामी‎ विधानसभा लढावी लागणार आहे. तेव्हा‎ हिंदुत्ववादी मते काही प्रमाणात आपल्याकडे‎ वळावी, या उद्देशाने काँग्रेसचे प्रयत्न सुरू‎ झाल्याचे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.‎ मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवासाठी ‎ ‎ तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‎ ‎ नेतृत्वाखाली तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार‎ यांनी २०२२-२३च्या अर्थसंकल्पात ७५ कोटींची ‎ ‎ घोषणा केली. त्या वेळचे उद्योगमंत्री सुभाष देसाई ‎ ‎ यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन झाली‎ होती. पण त्यानंतर ते सरकार पडले.‎ शिंदे-फडणवीस सरकारने संदिपान भुमरेंच्या ‎ ‎ अध्यक्षतेखाली नवी समिती नेमली. पण एक‎ रुपयाही निधी दिला नाही. याबाबतचे वृत्त ‘दिव्य ‎ ‎ मराठी’ने प्रकाशित केल्यावर अशोक चव्हाण‎ यांनी अधिवेशनात आवाज उठवला. तेव्हा ‎ ‎ फडणवीसांनी निधी देऊ, असे आश्वासन दिले.‎

तालुकानिहाय व्याख्याने, सत्कार :‎ काँग्रेसच्या सोहळ्यात मराठवाड्यातील प्रत्येक‎‎ तालुक्यात व्याख्यानांचे आयोजन केले जाईल.‎ मराठवाडा मुक्तीसाठी काँगर्ेसने कशी लढाई‎ लढली, याची माहिती दिली जाणार आहे.‎ दरम्यान, भाजपतर्फे मुक्तिसंग्राम सोहळा‎ नियोजनाची जबाबदारी असलेले किशोर शितोळे‎ म्हणाले की, सप्टेंबरपर्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे‎ नियोजन केले जात आहे. ग्राउंड पातळीवर काय‎ सुरू आहे याची त्यांना माहिती नसल्यामुळे‎ काँग्रेस केवळ आरोप करत आहे.‎

युती शासनाच्या काळातच मराठवाड्यातील‎ जिल्ह्याच्या शहरात स्तंभ उभारले गेले.‎ आगामी विधानसभा उद्धवसेनेसोबत लढताना‎ काही हिंदुत्ववादी मते मिळावीत, असा‎ काँग्रेसच्या नेत्यांचा हेतू दिसतो. कारण आतापर्यंत‎ काँग्रेसने कधीच उत्साहाने मुक्तिसंग्राम दिन‎ साजरा केला नाही. अर्थात राजकारणासाठी का‎ होईना काँग्रेसचे मुक्तिसंग्रामात सक्रिय होणे‎ चांगले आहे. पण काँग्रेसने या निमित्ताने काही‎ ठोस मराठवाड्याला मिळवून द्यावे, अशी‎ नागरिकांची अपेक्षा असल्याचे स्वामी रामानंद‎ तीर्थ संशोधन संस्थेचे सचिव, राजकीय‎ घडामोडींचे अभ्यासक सारंग टाकळकर यांनी‎ सांगितले.‎

सोमवारी ठाण्यातील राज्य कार्यकारिणी बैठकीत‎ प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदियांनी मुक्तिसंग्राम‎ सोहळा काँग्रेसतर्फे धूमधडाक्यात साजरा‎ करण्याचा ठराव मांडला. तो प्रदेशाध्यक्ष नाना‎ पटोले, अशोक चव्हाण यांच्या पाठिंब्याने मंजूरही‎ झाला. भाजपप्रणीत राज्य सरकार‎ मुक्तिसंग्रामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा‎ आरोपही त्यांनी केला.‎